Share

थलपती विजय पोहोचले पंतप्रधान मोदींच्या दरबारी, २५ मिनिटांच्या ‘त्या’ गुपित भेटीने उडाली खळबळ!

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यांच्या या २५ मिनिटांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Published On: 

CM Thalapathy Vijay Meet PM Modi: मोदी-विजय भेटीने खळबळ

काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार चालवणारे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय (CM Thalapathy Vijay) अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचले तर राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच ना? होय, सध्या याच एका भेटीने दिल्ली ते चेन्नईपर्यंतचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची (PM Modi) भेट घेतली. हातात फुलांचा गुच्छ आणि चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन गेलेल्या विजय यांचं पंतप्रधानांनीही त्यांच्या नेहमीच्या शैलीत अगदी हसतमुखानं स्वागत केलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन मोठ्या नेत्यांमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर ही भेट झाली असून ती साधारण २५ मिनिटे चालली. या भेटीतील सौहार्दपूर्ण वातावरणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

CM Thalapathy Vijay Meet PM Modi 

सध्या विजय हे काँग्रेसच्या मदतीने सत्तेत आहेत, त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. दिल्लीत पोहोचताच विजय यांनी सर्वात आधी ‘तामिळनाडू हाऊस’ गाठलं आणि त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास ‘सेवा तीर्थ’ येथे त्यांची पंतप्रधानांशी भेट झाली.

दुसरीकडे, तामिळनाडूत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या ‘एआयएडीएमके’चे काही आमदार विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळेच या २५ मिनिटांच्या भेटीत नेमकं काय शिजलं, याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अर्थात, या भेटीमागे काही महत्त्वाची प्रशासकीय कारणंदेखील आहेत. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री विजय यांनी तामिळनाडूच्या विकासाचे काही रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही भेट घेतली. यामध्ये सर्वात मोठी मागणी होती ती शासकीय कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ ऐवजी ‘तामिळ थाई’ या राज्यगीताला प्राधान्य देण्याची.

याशिवाय, कावेरी नदी पाणीवाटपाचा ‘मेकेदातू’ वाद आणि डीआरडीओच्या ‘कॅब्स’ (CABS) प्रकल्पाची सुविधा तामिळनाडूत उभारण्याबाबतही त्यांनी पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली. श्रीलंका नौदलाचा मुद्दाही या बैठकीत गाजला.

धक्कादायक माहिती अशी की, सध्या ५८ तमिळ मच्छिमार श्रीलंकेच्या तुरुंगात खितपत पडले असून त्यांच्या २८८ बोटी जप्त केल्या आहेत. या मच्छिमारांच्या सुटकेसाठी विजय यांनी पंतप्रधानांना थेट साकडं घातलं आहे. आता या सर्व मागण्यांवर केंद्र सरकार तातडीने काय पाऊल उचलतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install