🕒 1 min read
विश्वचषक तोंडावर आलाय, पण एका हट्टामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे, असं कधी पाहिलंय का? सध्या ICC vs Bangladesh T20 World Cup Row मुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) भारतामध्ये येऊन खेळायला तयार नाही आणि हा वाद आता विकोपाला जाण्याची चिन्हं आहेत. बांगलादेशच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे खुद्द आयसीसीचे चेअरमन जय शाह आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
ICC vs Bangladesh T20 World Cup Row
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचं कारण पुढे करत आपले सामने भारतात न खेळवता श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. पण आयसीसीने ही मागणी केराच्या टोपलीत टाकली आहे. आयसीसीच्या अहवालानुसार, भारतात खेळाडूंना कोणताही धोका नाही, तरीही बांगलादेशचा ‘तोरा’ काही कमी व्हायला तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशने जर आपला हट्ट सोडला नाही, तर त्यांच्यावर अशी कारवाई होईल जी आजवर क्रिकेटच्या इतिहासात कधीच झाली नसेल.
दुसरीकडे, आता चर्चा अशी आहे की जय शाह तातडीने दुबईला पोहोचले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “जर बांगलादेशचा संघ टी-20 वर्ल्ड कपसाठी भारत दौऱ्यावर आला नाही, तर आयसीसी चेअरमन जय शाह सख्त पावले उचलण्याचा विचार करू शकतात.” बांगलादेशला आयसीसीने निर्णयासाठी 21 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती, पण अजूनही त्यांनी आपलं म्हणणं स्पष्ट केलेलं नाही.
त्यामुळेच आता आयसीसीने प्लॅन बी तयार ठेवल्याचं बोललं जातंय. जर बांगलादेशने माघार घेतली, तर त्यांची जागा स्कॉटलंडला दिली जाऊ शकते. बांगलादेशने गट बदलण्याची आणि आयर्लंडसोबत अदलाबदल करण्याचीही मागणी केली होती, पण ती सुद्धा फेटाळण्यात आली आहे. एकंदरच, बांगलादेशची ही ‘बार्गेनिंग’ आता त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे. जर बांगलादेश बाहेर फेकला गेला, तर त्यांच्या क्रिकेटसाठी हा खूप मोठा धक्का असेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- 6 धावांत 2 विकेट्स पडल्या, मग ईशान-सूर्याने ‘गेम’ फिरवला; रायपूरमध्ये भारताचा दणदणीत विजय!
- ‘त्या’ रात्री बाळासाहेबांनी जीव वाचवला नसता तर…; बिग बींनी सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा!
- आधी पाकिस्तानी खेळाडूंना मिठी, मग हस्तांदोलन; इरफान पठाणच्या ‘त्या’ कृतीवर नेटकरी भडकले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












