Share

Balasaheb Thorat | सरकारने संभाजी भिडेंचा आजच बंदोबस्त करायला हवा – बाळासाहेब ठाकरे

🕒 1 min read Balasaheb Thorat | मुंबई: संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावतीमध्ये बोलत असताना महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधीजींचे करमचंद गांधी हे खरे वडील नसून त्यांचे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. Related News for You“पिसाळलेल्या संभाजी भिडेची नसबंदी करा!” – भिडे यांच्या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Balasaheb Thorat | मुंबई: संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावतीमध्ये बोलत असताना महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

महात्मा गांधीजींचे करमचंद गांधी हे खरे वडील नसून त्यांचे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भिडे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आज विधिमंडळ सभागृहात केली आहे.

संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

Sambhaji Bhide’s intention is to destabilize the environment of Maharashtra – Balasaheb Thorat

थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे.

संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे.

कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.

थोरात म्हणाले, पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, असे आमचे स्पष्ट मत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते.

असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती.

थोरात यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले, एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडे सारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही