Share

‘मला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?’; सोनम वांगचुक संतापले

NEET-UG पेपर लीक प्रकरणी २६ दिवसांचं उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारशी तडजोड केल्याच्या आरोपांवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले.

Published On: 

sonam wangchuk

दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले. आपला २६ दिवसांचा उपोषण मागे घेण्यासाठी सरकारने कोणतीही ‘तडजोड’ (डील) केली होती, या दाव्यांचे त्यांनी खंडन केले. NEET-UG पेपरफुटी आणि परीक्षेसंबंधीच्या इतर अनियमिततेबाबत न्याय मिळवण्यासाठी जवळपास महिनाभर उपोषण केल्यानंतरही, ‘मला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?’, असा संतप्त सवाल त्यांनी टीकाकारांना केला.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, सोनम वांगचुक यांनी सरकारशी तडजोड केल्याच्या दाव्यांवर नाराजी व्यक्त केली. उपोषण मागे घेण्याचा आपला निर्णय राजकीय गणितांच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ आपल्या ट्विटर (X) खात्यावरही शेअर केला.

“२६ दिवसांचे उपोषण मागे घेतल्यानंतरही ‘मला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनेलवरील २२ मिनिटांचा संपूर्ण व्हिडिओ पहावा आणि माझा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

२६ दिवसांचे उपोषण, ११ किलो वजन घटले

“विद्यार्थ्यांसाठी २६ दिवस उपोषण करणे, ११ किलो वजन कमी होणे आणि लडाखच्या अतिथंडीतून दिल्लीच्या कडक उन्हात येणे, हे सर्व सहन केल्यानंतर, माझ्या उपोषणाची पवित्रता, ते मी कोणाच्या सांगण्यावरून संपवले किंवा मी काही तडजोड केली का, याबद्दल ‘मला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?’

“मी कोणालाही दोष देत नाही, कारण मी ज्या परिस्थितीतून गेलो आहे, त्याबद्दल तुमच्यापैकी बहुतेकांना कल्पना नाही. गेल्या एक-दोन आठवड्यांत माझ्या कुटुंबाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला, त्याबद्दल तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे, कोणाचेही म्हणणे ऐकण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासा. त्यांच्या मनात काही द्वेषभाव आहे का? ते एखाद्या अशा राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का? जो दुसऱ्या पक्षाचा विरोधक आहे, की ते निष्पक्ष व्यक्ती आहेत? जर ते निष्पक्ष असतील, तर नक्कीच त्यांचे म्हणणे ऐका,” असे सोनम वांगचुक म्हणाले.

सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर वांगचुक यांनी हे विधान केले. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगत त्यांनी आपले २६ दिवसांचे उपोषण मागे घेतले होते. यापूर्वी, सोनम वांगचुक यांच्या पत्नी, गीतांजली अंगमो यांनीही लोकांना या निर्णयाबाबत घाईघाईने मते न बनवण्याचे आवाहन केले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही