दिल्ली : NEET-UG पेपर लीक मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबाबत आणि कथित अत्याचारांबाबतच्या दोन स्वतंत्र याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी, २७ जुलै रोजी संमती दर्शवली. ज्येष्ठ वकील श्याम दिवाण आणि गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या गंभीर विषयावर तातडीने सुनावणी (Hearing) घेण्याची विनंती केली.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी यापूर्वी, गेल्या दोन दिवसांत न्यायालयाबाबत पसरलेल्या चुकीच्या माहितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. “गेल्या दोन दिवसांत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी विधाने केली गेली. आज सकाळी १० वाजेपर्यंत न्यायालयात अधिकृतपणे याचिका दाखल झाले नव्हते. न्यायालयाला केवळ एक साधे पत्र किंवा निवेदन प्राप्त झाले होते. अशा पत्राला मी थेट ‘रिट याचिका’ (writ petition) म्हणून कसे काय ग्राह्य धरू शकतो?” अशी टिप्पणी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केली होती.
शुक्रवारच्या कामकाजादरम्यान, वकील गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायालयाला माहिती दिली की, सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने या याचिकांना क्रमांक दिले आहेत. २० जुलै रोजी दिल्लीत आयोजित ‘संसद चलो’ रॅलीदरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. संसद भवनाच्या दिशेने कूच करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर केला. यात लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांचा (tear gas shells) समावेश होता. या घटनेत अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. पोलिसांच्या या हिंसक कारवाईविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, यात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘विद्यार्थ्यांना तुडवण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला?’ NEET आंदोलनावर राज ठाकरेंचा संतप्त सवाल
- मोठी घडामोड! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर उद्या मोठा निर्णय? सरकारने CJP कडे मागितला वेळ
- ‘आज रात्री आम्हाला अटक होणार’; अभिजीत दिपकेंचा मोठा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












