Share

नव्या शिक्षणमंत्र्यांवर प्रियांका गांधींचा गंभीर आरोप; लोकसभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

पेपरफुटीविरोधी सुधारित विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला.

Published On: 

Gandhi-Joshi

दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज गेल्या आठवडाभरापासून ठप्प होते. अखेर मंगळवारी कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. सोमवारी सादर करण्यात आलेल्या ‘पेपर लीक’ (Paper Leak) विरोधी सुधारित विधेयकावरील चर्चेदरम्यान, काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यांच्या एका विशिष्ट विधानामुळे लोकसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रियांका गांधी यांनी जोशींच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ देत त्यांना कोंडीत पकडले. त्यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी अशा व्यक्तीची शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे, ज्यांनी यापूर्वी एका गर्भवती महिलेवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांची सुटका झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. पंतप्रधान मोदी यातून कोट्यवधी जनतेला कोणता संदेश देत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रियांका गांधींच्या या विधानामुळे भाजपचे खासदार संतापले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधानावर आक्षेप घेत ते बदनामीकारक असल्याचे म्हटले आणि ते कामकाजाच्या नोंदीतून काढून टाकण्याची मागणी केली. तसेच, त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यात हस्तक्षेप केला. त्यांनी नियमांचा हवाला देत सदस्यांना तथ्यांची पुष्टी केल्याशिवाय न बोलण्याची ताकीद दिली. यावर प्रियांका यांनी स्पष्ट केले की, बिलकिस बानो प्रकरणाबाबत प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या विधानाची त्या पुष्टी करतील.

मात्र, प्रल्हाद जोशी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आग्रह धरला की, बोलण्याची परवानगी देण्यापूर्वी त्या दाव्याची पुष्टी केली जावी. “चुकीची माहिती सादर केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी या विधानाची पुष्टी केलीच पाहिजे. मला या आरोपांबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. मी हे आरोप फेटाळून लावतो. त्यांनी यासाठी माफी मागितली पाहिजे,” असे संतप्त जोशी म्हणाले.

प्रियांका गांधी यांनी एका वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे आपला आरोप सिद्ध करण्याची तयारी दर्शवली. तरीही, अध्यक्षांनी हस्तक्षेप करत त्यांना केवळ विधेयकावरच बोलण्याचा आग्रह धरला. त्यानंतर हा वाद शमला आणि प्रियांका गांधी यांनी विधेयकावर आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्यांना आपला सल्लागार बदलण्याचा सल्ला दिला. तसेच, प्रत्येक गोष्टीसाठी विरोधकांना दोष देता येणार नाही आणि केवळ पोकळ राजकीय खेळी खेळून चालणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही