Share

अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यातील वाद मिटला? सगळं ठीक…!

Abhishek Sharma has finally opened up about his heated fight with Digvesh Rathi during the IPL 2025 clash between SRH and LSG. He confirmed things are now resolved between them.

Published On: 

Abhishek Sharma has finally opened up about his heated fight with Digvesh Rathi during the IPL 2025 clash between SRH and LSG. He confirmed things are now resolved between them.

🕒 1 min read

लखनौ | IPL 2025: लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर सोमवारी झालेल्या IPL सामन्यानंतर Sunrisers Hyderabad चा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि Lucknow Super Giants चा फिरकीपटू दिग्वेश राठी यांच्यात रंगलेल्या वादाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. मात्र सामन्यानंतर अभिषेक शर्माने स्वतः पुढे येत सांगितले की, “आता सर्व काही ठीक आहे.”

206 धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माला बाद करताच, दिग्वेश राठीने त्याच्या प्रसिद्ध “नोटबुक सेलिब्रेशन” व्यतिरिक्त हात हलवत चिडवणारा इशारा केला. या प्रकारामुळे अभिषेक संतापला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सामना पंचांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Abhishek Sharma speaks on Digvesh Rathi IPL 2025 fight

तणावानंतर, अभिषेक आणि दिग्वेशने सामन्यानंतर शांतपणे संवाद साधला. अभिषेकने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये सांगितले की, “दिग्वेशशी सामन्यानंतर बोललो. आता सगळं ठीक आहे.” त्यानंतर दोघेही खेळाडू एकमेकांना गळाभेट देताना दिसले आणि साऱ्या वादावर पडदा टाकला.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

India Cricket IPL 2025 Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या