🕒 1 min read
Namdev Shastri । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणातील 8 आरोपींना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. परंतु, यातील कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा आरोपी अजूनही पोलिसांना गुंगारा देण्यास यशस्वी ठरत आहे. दरम्यान, सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
अशातच काल भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, नामदेव शास्त्रींच्या निर्णयामुळे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय दुखावले आहे. याबाबत आता धनंजय देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे.
“नामदेव शास्त्री म्हणाले की या हत्येतील आरोपींची मानसिकता खराब झाली. पण त्यांच्याकडे सगळी माहिती नसल्यामुळे ते असे म्हणाले. आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल? आमची लेकरे पोरकी झाली आहेत. माझा भाऊ गेला आहे. आई-वडील म्हातारे झाले आहेत. आता आम्ही काय करायचे? आमचा भाऊ परत कुठून आणायचा? असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
Dhananjay Deshmukh on Namdev Shastri Maharaj
पुढे ते म्हणाले की, “नामदेव शास्त्री यांना याप्रकरणातील खरी माहिती अशी आहे की, मस्साजोग येथील अवादाच्या प्लांटवर खंडणीसाठी ते सगळे आरोपी आले होते. त्यांनी आमच्या गावातील दलित बांधवाला मारहाण केली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे. हत्या केलेल्या आरोपींवर किती गुन्हे आहेत? याची कोणाला माहिती नाही. हे सगळे पुरावे घेऊन आम्ही भगवानगडावर जाणार आहे, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Budget 2025 मुळे बळीराजाचे पालटणार नशीब? अर्थमंत्र्यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
- संतापजनक! Eknath Shinde यांच्या नेत्याच्या हत्येमागचं मोठं कारण आलं समोर, जाणून तुम्हालाही बसेल धक्का
- चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई होणार? Aditi Tatkare यांचं मोठं विधान, म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










