Share

Tuljabhavani Mandir | तुळजाभवानी मंदिर संस्थानांच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत; यापुढे तोकडे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही

Tuljabhavani Mandir | तुळजाभवानी मंदिर | महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराबाबत आज (18 मे) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून तुळजाभवानी मंदिर परिसरात फलकही लावण्यात आले आहेत. पाश्चात्य कपडे परिधान करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यता जपण्याचे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून … Read more

Published On: 

Tuljabhavani Mandir | तुळजाभवानी मंदिर | महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराबाबत आज (18 मे) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून तुळजाभवानी मंदिर परिसरात फलकही लावण्यात आले आहेत. पाश्चात्य कपडे परिधान करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय संस्कृती आणि सभ्यता जपण्याचे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या निर्णयाचे नागरिकांकडूनही स्वागत होत आहे. यामध्ये काहींनी प्रतिक्रियाही दिल्या असून कुठेतरी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. यामुळे मंदिर प्रशासनाने जो काही निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. अशा शब्दांत नागरिकांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, याबाबत काही पोस्ट आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. त्यात रणजित जाधव यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थेने जो काही निर्णय घेतला आहे, तोच निर्णय देशातील सर्व मंदिरांनी महाराष्ट्रात घेणे आवश्यक आहे, अशी टिप्पणी केली आहे. तसेच हा नियम सर्व मंदिरांमध्ये पाळला जावा, अशी टिप्पणी सोशल मीडियावर अमर पाटील यांनी केली आहे. 

नागरिकांच्या प्रतिक्रिया – 

प्रत्येक मंदिरात हे नियम असले पाहिजेत, आपली संस्कृती, आपला धर्म टिकला पाहिजे, मंदिरात गेलो की फॅशन शो बघायला कळत नाही, मंदिरात गेल्यावर आपलीच माणसं फॅशनच्या नावाखाली आपली संस्कृती आणि धर्म विसरत आहेत. …जय श्रीराम – लखन माळी 

अशा लोकांना मंदिरात प्रवेश न देणे हा अतिशय चांगला निर्णय आहे – सतीश मोरे

केवळ तुळजाभावीच नाही तर सर्व पवित्र मंदिरांवर बंदी घालावी अन्यथा येथील राजकारणी इतके नालायक आहेत की ते अनावश्यक गोष्टींवर राजकारण करतील. चांगल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी – अजिंक्य गायकवाड 

या निर्णयाचे मनापासून स्वागत आहे असे म्हणायला हरकत नाही, पण फॅशनच्या नावाखाली अक्कल नसलेले लोक मंदिराचे पावित्र्य जपत नाहीत – गजानन 

संस्कृती जपली पाहिजे हे खरे आहे. ज्यांना पटत नाही त्यांनी एक तर मंदिरात येणे बंद करावे किंवा किमान पुजारी व्हावे! – विश्वजित 

 

महत्वाची बातमी-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही