Share

Chitra Wagh | सुप्रिया ताईंची रंग बदलण्याची कला पाहून सरड्यालाही लाज वाटेल – चित्रा वाघ

🕒 1 min readChitra Wagh | मुंबई: मुंबईतील मरीन लाईन्स येथे महिला वस्तीगृहात एका तरुणीची हत्या झाली होती. त्यानंतर मीरा रोड परिसरात एका महिलेची हत्या झाल्याचा प्रकरण समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chitra Wagh | मुंबई: मुंबईतील मरीन लाईन्स येथे महिला वस्तीगृहात एका तरुणीची हत्या झाली होती. त्यानंतर मीरा रोड परिसरात एका महिलेची हत्या झाल्याचा प्रकरण समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. तुमचं सरकार होतं तेव्हा तुमच्या संवेदना मुलींसाठी जाग्या झाल्या नाही. त्याचबरोबर तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरची हाक ऐकू आली नव्हती, असं चित्रा वाघ ट्विट करत म्हटलं आहे.

Chitra Wagh Tweet

सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो @supriya_sule

तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेंव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं..

श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही 35 तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच !

मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस जी @Dev_Fadnavis
या सक्षम नेत्याकडे आहे.

त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही,मोठठ्या ताई…

दरम्यान, कोल्हापूर आंदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “मला आश्चर्य आणि गंमत वाटते की भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण सारखाच दूषित होत आहे. राज्यामध्ये सारख्या दंगली होत राहिल्या तर राज्याचं नुकसान होणार आहे. राज्यामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे जनता घाबरली आणि बिथरली आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!