मुंबई – विधानपरिषद निवडणुकीत भाजपविरोधात शड्डू ठोकणारे शिवसेना नेते अब्दुल सत्तार आता अचानक बॅकफूटवर का गेले, हा प्रश्न संपूर्ण जिल्ह्याला पडला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने दावा केलेल्या जागेवर सत्तारांचे चिरंजीव समीर यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीत मोठी खळबळ उडाली होती. मात्र, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर हे बंड आता पूर्णपणे शमले आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीनंतर सत्तारांचा सूर कमालीचा बदलला आहे. “आज मुख्यमंत्र्यांनी मला वेळ दिला आणि आमच्या जिल्ह्याच्या नेत्यांच्या समस्या अगदी शांतपणे ऐकून घेतल्या,” अशी माहिती सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
त्यामुळेच, पुढचे राजकारण करताना महायुतीचा धर्म दोघांनीही पाळावा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देणार असल्याचे सत्तारांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्र्यांसोबतही याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत कुठेही दगाफटका होणार नाही, अशी ग्वाही आता सत्तार देत आहेत. भविष्यात कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात दोन्ही पक्षांनी समन्वयाने राहावे, यावर या बैठकीत एकमत झाले आहे.
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या समीर सत्तारांच्या उमेदवारीवरही त्यांनी मोठा खुलासा केला. सकाळी अकरा वाजता समीर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार आहे. तत्पूर्वी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी सकाळी दहा वाजता एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कोणत्याही आश्वासनाशिवाय ही माघार घेतल्याचा दावा सत्तारांनी केला आहे. “खालच्या पातळीवर आम्हाला जो त्रास दिला जात होता, त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. माझी नाराजी दूर करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले,” असल्याचे सत्तारांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमीर खान वयाच्या ६१ व्या वर्षी करणार तिसरं लग्न? गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाची तारीख अखेर समोर!
- फडणवीस सरकारच्या कर्जमाफीत जाचक अटी; विरोधकांचा मोठा हल्लाबोल अन् शेतकऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
- सावधान! समुद्रात उसळणार महाकाय लाटा; पावसाळ्यातले ‘हे’ ६ दिवस घराबाहेर पडूच नका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












