🕒 1 min read
मुंबईत सलग पाच दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे, दरडी कोसळतायत… पण या निसर्गाच्या कोपापेक्षा सध्या एका राजकीय पोस्टने जास्त खळबळ उडवून दिली आहे. सगळं काही ‘कोसळू’ द्यायचं का? असा थेट सवाल करत प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी नेमकं कोणाकडे बोट दाखवलंय?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना ताजी असतानाच, कुलकर्णींची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका अजेंड्याला पाठिंबा देणारं सरकार आहे म्हणून त्यांच्या सगळ्या चुकांना पाठीशी घालणं, हा स्वतःचा आणि पुढच्या पिढ्यांचा घात असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय.
Atul Kulkarni Post
“‘बिनशर्त पाठिंबा’ हा लोकशाहीमधला सगळ्यात धोकादायक प्रकार असतो,” असे थेट शब्द कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये वापरले आहेत. त्यामुळेच… या पोस्टचा रोख थेट राज्य सरकार आणि त्यांच्या समर्थकांकडे असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
कुणाचंही थेट नाव न घेता, स्वतःची सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं ‘कोसळू’ द्यायचं का? हा निर्णय ज्याचा त्याचा आहे, असा टोला त्यांनी लगावला. कोसळणारा पाऊस आणि राजकीय परिस्थिती यांची त्यांनी अत्यंत मार्मिक सांगड घातली आहे.
दुसरीकडे… मुंबई आणि उपनगरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने मुंबईला ‘रेड अलर्ट’ दिला असून, आज दुपारी ४.२६ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन दिवसांत मुंबईत जवळपास ३५० झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिकच्या कळवण पट्ट्यात तर ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार… संपूर्ण राज्यात आपत्ती व्यवस्थापन विभाग सध्या हाय अलर्टवर आहे. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर भागातही वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- आमिर खानशी लग्न करताच गौरी स्प्रॅटने खरंच धर्म बदलला? लग्नानंतर चर्चांना उधाण
- मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मोठी गुड न्यूज! फिजी-ऑस्ट्रेलिया करारामुळे भारताला धोरणात्मक फायदा
- 5 कोटींचं सोन्याचं रामचरितमानस गायब? माजी IAS चा दावा; ट्रस्टने सांगितलं सत्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












