Share

“जास्त बाम लावल्यामुळे डोक्यावर परिणाम!”; आदित्य ठाकरेंची रामदास कदमांवर खरमरीत टीका

Aditya Thackeray slams Ramdas Kadam: “Too much balm affects the brain.”

Published On: 

Aaditya Thackeray mocks Ramdas Kadam after his comment on Raj Thackeray insult.

🕒 1 min read

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अपमान केल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी केल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी कदम यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “जास्त बाम लावल्यामुळे डोक्यावर परिणाम होतो, हे त्यांचं उत्तम उदाहरण आहे,” अशा बोचऱ्या शब्दांत आदित्य ठाकरेंनी रामदास कदम यांच्यावर जहरी टीका केली आहे.

रामदास कदम यांनी नुकतेच उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे यांचा अपमान केल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला. याच आरोपांना उत्तर देताना आदित्य ठाकरे आक्रमक झाले.

Aaditya Thackeray Slams Ramdas Kadam Over Raj Insult claims

आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, “ज्या व्यक्तीचा निवडणुकीत दोन वेळा पराभव झाल्यानंतर देखील विधानपरिषद दिली, मंत्रीपदे दिली, पण तरीही ते पळून गेले. त्या व्यक्तींवर मी ( Aaditya Thackeray ) आता बोलू इच्छित नाही.”

रामदास कदम हे शिवसेनेच्या स्थापनेपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले. तेव्हापासून ठाकरे गट आणि रामदास कदम यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Mumbai Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या