🕒 1 min read
नाशिक– ऐनवेळी राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ आता वेगळा मार्ग निवडणार का? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार घुमतोय.
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळांची वर्णी लागेल, अशी दाट शक्यता होती. मात्र, शेवटच्या क्षणी पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. यामुळेच आता नाशिक आणि येवल्यातील भुजबळ समर्थकांचा संताप अनावर झाला आहे.
Chhagan Bhujbal नाराज? ‘साहेब निर्णय घ्या’ ची बॅनरबाजी
तिकीट नाकारल्याची बातमी धडकताच येवला शहरात ठिकठिकाणी समर्थकांनी थेट पोस्टर्स लावले आहेत. “साहेब, आता निर्णय घ्या”, अशी आक्रमक साद या बॅनरवरून घालण्यात आली आहे. राज्यसभा उमेदवारांच्या यादीतून नाव बाहेर पडल्याने समर्थकांमध्ये प्रचंड रोष आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेत जाण्यापूर्वी पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी अट भुजबळांनी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवली होती. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत दिल्लीपर्यंत पोहोचवली गेली.
मात्र, केवळ एका व्यक्तीसाठी मंत्रिमंडळ विस्तार किंवा शपथविधी शक्य नसल्याचे कारण देत दिल्लीतून या प्रस्तावाला नकार मिळाला. याच कारणामुळे पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली. स्वतः भुजबळांनीही आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा होती, अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता या बॅनरबाजीने राजकारण आणखी तापलं असून, भुजबळ काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- विधान परिषदेत घोडेबाजार? सुप्रिया सुळेंच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
- 15 लाख कोटींचा घोटाळा, मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? रोहित पवारांच्या एका ट्विट खळबळ
- सोसायटीतील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, यूट्यूबर प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












