🕒 1 min read
एखादा मोठा अभिनेता रिअॅलिटी शोमध्ये जाऊन चुकीच्या वागणुकीमुळे अचानक ट्रोल का होतो? सध्या सोशल मीडियावर असाच एक किस्सा तुफान चर्चेत आहे, ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप २’ (Lock Upp 2) या बहुचर्चित शोमध्ये नुकताच एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला. लोकप्रिय अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) याने चक्क शोचा सूत्रसंचालक रितेश देशमुखसोबत (Riteish Deshmukh) अत्यंत उद्धटपणे वाद घातला.
Ram Kapoor Lock Upp 2
या प्रकारानंतर प्रेक्षकांनी राम कपूरला चांगलंच धारेवर धरलं असून, बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानचं नाव घेत त्याला खडेबोल सुनावले आहेत. शोमध्ये सध्या एक महत्त्वाचा टास्क सुरू होता. हर्षद चोपडा आणि आकांक्षा चमोला यांच्या हातात पेंटबॉल गन्स होत्या, तर सुरक्षित राहण्यासाठी इतर स्पर्धकांना गोळी न लागता बझरपर्यंत पोहोचायचं होतं.
दरम्यान, राम कपूर बझरपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरला आणि त्याने मध्येच पाणी मागितलं. पाणी न मिळाल्याने त्याचा संयम सुटला. “मी खूप वेळापासून पाणी मागतोय, तुम्ही पाणी देत नाही, हे बरोबर नाही,” असं म्हणत त्याने थेट खेळ थांबवला आणि तो मैदानात मध्यभागी उभा राहिला.
राम कपूरचा हा आडमुठेपणा पाहून रितेश देशमुखने त्याला पेंटबॉल लागण्याचा इशारा दिला. पण त्यावरही रामने, “लागू दे, या मारा,” असं अत्यंत उद्धट उत्तर दिलं.
अखेर रितेशने त्याला स्पष्ट शब्दांत सुनावत सांगितलं की, प्रत्येक स्पर्धकाला आधीच वैयक्तिक पाण्याची बाटली दिली असून ती सोबत ठेवणं ही सर्वस्वी त्या स्पर्धकाची जबाबदारी आहे. हे ऐकल्यावर राम बाजूला झाला.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी राम कपूरची जोरदार शाळा घेतली. “सलमान खानच्या पुढे असं काही करण्याची याची हिंमत होईल का?”, “हा इतका ओव्हरअॅक्टिंग का करतोय?”, अशा संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सध्या या शोचे सूत्रसंचालन फराह खान आणि रितेश देशमुख करत असून, सुरुवातीपासूनच हा सीझन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- श्रेयस तळपदेला नाकारलं होतं होम लोन, शाहरुखच्या एका सहीने संध्याकाळपर्यंत फिरवली चक्रं!
- Moises Henriques ची नवी इनिंग! ऑस्ट्रेलियानंतर आता पोर्तुगालसाठी खेळणार
- SC Sub-Categorisation वरून विधानसभेत गोंधळ; मुख्यमंत्र्यांनी मांडली सरकारची बाजू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












