मुंबई – शरद पवार गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक मोठा धक्का बसणार का? माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे कमळ हाती घेणार, या एका चर्चेने सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून टोपेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय. या सगळ्या घडामोडींवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांना छेडलं असता, त्यांच्या एका हसूने आणि सूचक मौनाने मोठी खळबळ उडाली आहे. दानवेंची ही देहबोलीच बरंच काही सांगून जात असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Rajesh Tope BJP Entry rumors
पत्रकारांनी दानवे यांना टोपेंच्या संभाव्य प्रवेशावर थेट प्रश्न विचारला. तेव्हा ते अत्यंत मिश्किलपणे हसले. “मी सध्या यावर काहीच बोलणार नाही, तुम्ही थेट राजेश टोपेंनाच जाऊन विचारा. पण जर ते आले, तर पक्षासाठी ती नक्कीच चांगली गोष्ट आहे,” असं म्हणत दानवे यांनी एका प्रकारे या चर्चांना हवाच दिली. त्यामुळेच आता पडद्यामागे नेमकं काय शिजतंय, याची उत्सुकता वाढली आहे.
पुढे बोलताना दानवेंनी स्पष्ट केलं की, पक्षात येणाऱ्या कोणालाही भाजप आधीच पदाचं आश्वासन देत नाही. दुसरीकडे, ज्यांचं मूळ नेतृत्व कमकुवत झालंय त्यांच्यासाठी भाजपशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे जे कोणी पक्षात येऊ इच्छितात त्या बिचाऱ्यांचं भविष्य उज्ज्वल असल्याचा टोमणाही त्यांनी शरद पवार गटाला मारला. “माझ्या बोलण्याने कोणी येईल किंवा थांबेल असं अजिबात नाही,” असंही दानवे हसत-हसत म्हणाले.
याचवेळी अब्दुल सत्तार यांच्या एका विधानाचा संदर्भ देत दानवे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. “भाजप हा एक अथांग समुद्र आहे, ज्यात अनेक नद्या येऊन मिळतात. नवीन आलेल्यांना संधी दिली तरच बाहेर असणाऱ्यांना आशा वाटते. प्राजक्त तनपुरे यांना आम्ही संधी दिली, ते जयंत पाटलांचे भाचे आहेत. त्यामुळे आता जयंत पाटलांनाही वाटू शकतं की भाजपमध्ये गेल्यावर काहीतरी नक्की मिळतं. मग आपणही विचार करायला काय हरकत आहे?” असा थेट सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण एक मोठी अट!
- देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; लाडकी बहीण योजनेचे पैसे ‘यांच्या’ खिशातून वसूल करणार!
- देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीवर मोठी घोषणा, पण अधिकृत घोषणेसाठी बळीराजाला वाट का पाहावी लागणार?












