🕒 1 min read
मुंबई– राजकारणाचा स्तर कुठपर्यंत खाली जाणार आहे? आधी ‘मामु’, मग ‘चाटम’ आणि आता थेट ‘चिल्लर’! मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे विरुद्ध भाजप हा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘मामु’ असा केला होता, त्याला उद्धवजींनी ‘चाटम’ म्हणून प्रत्युत्तर दिलं. पण आता युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी साटम यांच्याबाबत बोलताना पातळीच बदलून टाकली आहे.
Aaditya Thackeray on Amit Satam
साटम यांनी ठाकरेंवर ३ लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. यावर विचारलं असता आदित्य ठाकरे एका वाक्यात विषय संपवत म्हणाले, “मी अशा ‘चिल्लर’ लोकांना ओळखत नाही आणि त्यांना उत्तरही देत नाही.” आदित्य यांच्या या एका वाक्याने भाजप गोटात चांगलीच आग लागण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेताना म्हटलं की, “मला वाटलं होतं ते सुसंस्कृत आहेत, पण आता त्यांचा खरा चेहरा उघड झालाय. कोस्टल रोडचं काम आम्ही केलं, पण श्रेय भाजप घेतंय. मग नोटबंदी, पडता रुपया आणि अतिरेकी हल्ल्यांचे श्रेयही तुम्ही घेणार का?” असा तिखट सवाल त्यांनी केला. सध्या महायुतीत पैशांवरून आणि बंगल्यांवरून भांडणं सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
२० वर्षांनी राज ठाकरे सेना भवनात!
एकीकडे आरोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे एक ऐतिहासिक क्षणही पाहायला मिळाला. तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे यांनी शिवसेना भवनाची पायरी चढली. यावेळी ठाकरे बंधूंनी ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रसिद्ध केला. यात ७०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी आणि ५ वर्षांत १ लाख परवडणारी घरं देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. भाजपने मात्र हा वचननामा ‘कॉपी-पेस्ट’ असल्याची टीका केली आहे. आता या ‘चिल्लर’ आणि ‘चाटम’ वादात मुंबईकर कोणाचं ऐकणार, हे पाहणं रंजक ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “हा कोण ‘चाटम’?”; ठाकरेंच्या एका शब्दाने अमित साटम भडकले, म्हणाले “तुम्ही तर ‘मातोश्री २’ बनवलं!”
- अजितदादा अन् साहेब पुन्हा एकत्र येणार? निलेश लंकेंनी फोडला बॉम्ब; म्हणाले, “दोघांनाही आनंदच होईल!”
- राज-उद्धव एकत्र आले तरी ‘फायदा’ नाही? फडणवीसांनी मांडली भाजपची ‘ती’ थिअरी, म्हणाले “तुमचा इंटरेस्ट तर…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












