Share

Shinde Group | ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाडांकडून महाराष्ट्रात दंगे घडवण्याचं प्लॅनिंग; शिंदे गटातील नेत्याचा आरोप

🕒 1 min read Shinde Group | ठाणे: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. उपोषण मागे घेतलं असलं तरी जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Shinde Group | ठाणे: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

उपोषण मागे घेतलं असलं तरी जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.

ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रात दंगे घडवण्याचं प्लॅनिंग करत असल्याचं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. मस्के यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

In Thane, the Maratha activists were going to protest peacefully – Shinde Group

नरेश मस्के म्हणाले, “मराठा क्रांती मोर्चाने ठाण्यात बंदचे आवाहन केले होते. ठाण्यामध्ये ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होते. त्यांना आंदोलन करण्यासाठी कोणीच विरोध केला नव्हता.

मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाण्यात आणि महाराष्ट्र दंगे कसे होतील, त्याचबरोबर हे मराठा मोर्चा तीव्र कसे होतील, याचं प्लॅनिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाची काही मंडळी करत आहे.

दोन्ही पक्षांनी त्यांचे शहराध्यक्ष आणि काही नेते प्रत्येक विभागात पाठवले होते. मात्र, मराठा समाजाने आणि नागरिकांनी त्यांना भाव दिला नाही. त्यामुळे ठाण्यातील बंद शांततेत पार पडला.

पुढे बोलताना ते म्हणाले, “ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी मोर्चाच्या आदल्या दिवशी लोकांना भडकवण्याचं काम करत होते. मात्र, त्यांच्या सांगण्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही.

मराठा समाजाचा प्रश्न फक्त एकनाथ शिंदे सोडवू शकतात, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाचे महाराष्ट्र पेटवण्याचे सर्व प्लॅन धुळीस मिळाले आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही