🕒 1 min read
Walmik Karad । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण (Santosh Deshmukh Murder) वेगळे वळण घेत आहे. हे प्रकरण सुरेश धस यांनी चांगलंच लावून धरलं आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी माध्यमांशी बोलताना अजून एक मोठा दावा केला आहे.
पंकजा मुंडे यांचा पराभव हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या दहशतीमुळे, त्यांच्या वागण्यामुळे झाला असा आरोप सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला. ते म्हणाले, “धनंजय मुंडे यांची परळीत दहशत नाही, पण वाल्मिक कराडची आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमुळे अनेकजण पंकजा मुंडेंवर नाराज झाले. त्याचा परिणाम हा लोकसभेच्या निवडणुकीत झाला.”
पुढे ते म्हणाले , “पंकजा मुंडे यांना माझ्या मतदारसंघातून 31 हजारांचे लीड मिळाले. परळीमधून 73 हजारांचे लीड मिळाले. पण एकट्या बीड तालुक्यातून त्या 98 हजारांनी मागे पडल्या. बजरंग सोनावणे लोकसभा निवडणुकीत निवडून आले. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. या दोघांच्या मैत्रीचं वाटोळं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलं. तेव्हापासून बजरंग सोनावणे विरोधात गेले, ते गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पडल्या नसत्या. ”
महत्वाच्या बातम्या :
- मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर Suresh Dhas भडकले, म्हणाले; “स्वतःहून राजीनामा…..”
- Dhananjay Munde राजीनामा देणार?; अजितदादांसोबतच्या बैठकीनंतर म्हणाले…
- “छगन भुजबळांची ‘ती’ भूमिका मला पटली नाही”; Vijay Wadettiwar स्पष्टच बोलले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










