Share

Supriya Sule | “मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे परत सिद्ध झालं, जनतेनं खोटेपणाला नाकारलं”

🕒 1 min read Supriya Sule | पुणे : पुण्यातील पोटनिवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघात भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे उमेदवर रवींद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांनी विजय मिळवून कसब्यात इतिहास रचला आहे. भाजपचा बालेकिल्ला धंगेकरांनी भेदला तब्बल 28 वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसबा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Supriya Sule | पुणे : पुण्यातील पोटनिवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघात भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे उमेदवर रवींद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांनी विजय मिळवून कसब्यात इतिहास रचला आहे.

भाजपचा बालेकिल्ला धंगेकरांनी भेदला

तब्बल 28 वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत धंगेकरांचा ऐतिहासिक विजय असल्याचं मानलं जातं आहे. या पराभवानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule reaction On Kasba Election Result

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत यशस्वी झालेले महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर हे मूळचे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत. ही आणखी एक आनंद द्विगुणित करणारी बाब आहे. धंगेकर कुटुंब हे मूळचे नाथाची वाडी, ता. दौंड येथील असल्याचे आहेत”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी धंगेकर यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

“पोटनिवडणुकीच्या विजयाच्या निमित्ताने भाजपला लोकांनी नाकारले असल्याचे सांगत मराठी माणूस पैशात विकला जात नाही”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी धंगेकरांचं अभिनंदन केलं आहे. पैसे वाटल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांवर झाला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

“हा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तसेच आणि नेत्यांनी केलेल्या संघटीत प्रयत्नांचा विजय आहे. यासाठी दिवसरात्र एक करुन प्रचार केलेल्या सर्वांचे मनापासून आभार. मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. राजकीय पक्षापेक्षा हा येथील विजय हा कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या विजयाचे खरे श्रेय हे कसब्यातील कार्यकर्त्यांना जाते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या