Share

भुलेश्वरच्या राजाच्या दुर्घटनेला खड्डे जबाबदार की दुसरंच काही? अग्निशमन दलाच्या माहितीतून मोठा गौप्यस्फोट

भुलेश्वरच्या राजाच्या मिरवणुकीत झालेल्या भीषण दुर्घटनेमागे खड्डे नव्हे, तर तुटलेलं वेल्डिंग कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Published On: 

Bhuleshwarcha Raja Ganpati idol accident reason investigation Mumbai

डोळ्यांदेखत २२ फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती कोसळते आणि एका क्षणात आनंदाचं रुपांतर आक्रोशात होतं! विचार करूनच अंगावर काटा येतो ना? मुंबईतल्या ‘भुलेश्वरच्या राजा’च्या आगमन मिरवणुकीत असाच काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला.

हसत-खेळत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत सुरू होतं. मंडळाच्या मंडपापासून मूर्ती अवघ्या ५०-६० मीटर अंतरावर आली होती. पण अचानक मूर्तीचा तोल गेला आणि ती थेट भाविकांच्या अंगावर कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. पण हा अपघात नेमका कशामुळे झाला?

Bhuleshwarcha Raja Accident: सत्य समोर!

दुर्घटना घडल्यानंतर साहजिकच सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षदर्शींमध्ये एकच चर्चा सुरू झाली. रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे ट्रॉलीचा तोल गेला आणि मूर्ती कोसळल्याचा दावा काही नागरिकांनी केला. “खड्ड्यात चाक अडकलं, एक मोठा झटका बसला आणि बाप्पाची मूर्ती हलायला लागली,” असं काही जणांचं म्हणणं होतं.

पण, आता अग्निशमन दल आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासातून एक वेगळाच खुलासा झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे रस्त्यावर असे कुठलेच मोठे खड्डे आढळले नाहीत. मग नेमकं काय घडलं?

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तीला मागच्या बाजूने आधार देण्यासाठी केलेलं ‘वेल्डिंग’ हाच या दुर्घटनेचा मुख्य सूत्रधार ठरला. हे वेल्डिंग पुरेसं मजबूत नव्हतं. अचानक हेच वेल्डिंग तुटलं आणि मूर्तीचा भार न पेलवल्याने ती थेट पुढील बाजूस कोसळली.

या दुर्दैवी घटनेत अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे (३३) आणि ब्रिजेश जोशी (३०) या दोन तरुणांचा करुण अंत झाला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तर, जखमी झालेल्या पाच जणांमध्ये ५ आणि ७ वर्षांच्या दोन लहान चिमुकल्यांचाही समावेश आहे.

दुसरीकडे, या दुःखाच्या प्रसंगी भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या कुटुंबांना मोठा मदतीचा हात दिला आहे. त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये, तर जखमींना १ लाख रुपयांची वैयक्तिक मदत केली आहे. बाप्पाच्या आगमनावेळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबईत मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही