🕒 1 min read
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी मोठं वक्तव्य करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी असलेली मैत्री संपुष्टात आल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसेमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शेलारांच्या या विधानाला मिश्किल टोला लगावत उत्तर दिलं. “आशिष शेलार आमचे चांगले मित्र होते, मग ते असं कसं नाराज झाले?”, असा सवाल करत त्यांनी आपल्या खास शैलीत टीका केली.
Ashish Shelar Ends Friendship with Raj Thackeray
महाजन पुढे म्हणाले की, “राज ठाकरे सध्या महाराष्ट्रात नाहीत, पण त्यांच्या घरातले – पाळीव प्राणी असो वा कुटुंबीय – सगळेच बेचैन आहेत. कालपासून आम्ही धक्क्यात आहोत. काही कार्यकर्त्यांनी तर अन्न-पाण्यालाही हात लावलेला नाही. या दुःखातून कसं सावरणार, हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे.” यातून मनसेने शेलारांच्या विधानाला मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- IMD Alert | १७ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात मात्र उष्णतेची लाट
- संरक्षित खतसाठा पुरवठा कालमर्यादेचे पालन करावे- जिल्हाधिकारी
- अभिनेत्री Rajeshwari Kharat ने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; टीका करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना झाप झापलं