🕒 1 min read
पाकिस्तानी नागरिकांच्या देशाबाहेर पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतर महाराष्ट्रात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं म्हटलं होतं, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कोणताही पाकिस्तानी बेपत्ता नसल्याचं सांगितलं होतं. या विरोधाभासावर आज फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं.
फडणवीस म्हणाले की, “कधी कधी अधिकार्यांकडून नेत्यांना वेगवेगळी माहिती दिली जाते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार आम्ही सर्व पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली आहे. कोणतीही व्यक्ती दुर्लक्षित राहिलेली नाही. पोलिसांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. देश सोडण्यासाठी जे पात्र आहेत, त्यांना पाठवले जाईल आणि अंतिम आकडेवारी नंतर जाहीर केली जाईल.”
Sindhi Hindus Will Not Be Deported, Clarifies Devendra Fadnavis
सिंधी समाजाविषयी संभ्रम निर्माण झाल्यानंतर फडणवीसांनी स्पष्ट केलं की, “पाकिस्तानी सिंधी हिंदू नागरिकांना परत जाण्याची गरज नाही. ते लाँग टर्म व्हिसावर आले आहेत आणि भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केले आहेत. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. केवळ मर्यादित कालावधीच्या व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई सुरू आहे.”
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितलं की, “आम्ही सर्व पाकिस्तानी नागरिकांना केंद्र सरकारचा आदेश कळवून त्यांच्यावर लक्ष ठेवतो आहोत.”
महत्वाच्या बातम्या
- भारत-पाक तणाव शिगेला; या देशाने पाकिस्तानला पाठवला मोठा दारुगोळा आणि फायटर जेट्स
- ‘छावा’ पाहून विजय देवरकोंडा भडकला; म्हणाला, “औरंगजेबाच्या कानाखाली वाजवेन!”
- “परेश रावलने १५ दिवस स्वतःची लघवी प्यायली? 😱 जाणून घ्या हा धक्कादायक किस्सा!