🕒 1 min read
मुंबई – भारत आणि पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामाची घोषणा केली होती. मात्र, ही शांततेची घोषणा फार काळ टिकली नाही. अवघ्या चार तासांतच पाकिस्तानने युद्धविराम तोडत राजौरी आणि बारामुल्ला येथे गोळीबार केला, तसेच जम्मू आणि राजस्थानमध्ये ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू शहरात तत्काळ ब्लॅकआउट करण्यात आले.
आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धविराम लागू झाल्याची घोषणा भारताने केली होती. ही घोषणा परराष्ट्र सचिवांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला दुपारी 3:15 ला फोन आला होता, त्यानंतर ही शस्त्रसंधी ठरवण्यात आली. मात्र चार तासांच्या आतच पाकिस्तानने याचे उल्लंघन केलं.
Pakistan Breaks Ceasefire in Just 4 Hours, Opens Fire in J&K and Sends Drones Over Jammu, Rajasthan
राजौरी आणि बारामुल्ला येथे गोळीबार झाला, श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले, तर जम्मू आणि राजस्थानमध्ये ड्रोन पुन्हा दिसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने भारतीय लष्कराला कठोर प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. सीमारेषेवर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- इंदिरा गांधी होना आसान नहीं, युद्धविरामानंतर काँग्रेसचा नरेंद्र मोदी सरकारला टोला
- युद्धविरामानंतरही पाकिस्तानचा उन्माद कायम; लष्कर, मंत्री आणि नेत्यांचे भारतविरोधी वक्तव्य
- मी पुन्हा सांगते…आम्ही अजूनही सतर्क आहोत; पाकिस्तान आर्मीला सज्जड दम!









