Monday - 2nd October 2023 - 10:12 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Nana Patole – पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये

बीआरएस भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही; तेलंगणा पॅटर्न फसवा, लवकरच पोलखोल करू:- नाना पटोले

by Maharashtra Desha
26 June 2023
Reading Time: 1 min read
पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये

शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाणुळे मुंबई पाण्यात, कोट्यवधी रुपये गेले कुठे ?

Share on FacebookShare on Twitter

Nana Patole  मुंबई, दि. २६ जून २०२३ – तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची सर्व माहिती काँग्रेसकडे आहे लवकर या फसव्या तेलंगणा पॅटर्नची पोलखोल करु, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, तेलंगणातील भारत राष्ट्र समिती महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस विचाराचेच सरकार यावे ही वारकरी व जनतेची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल. केसीआर यांनी ९ वर्षात तेलंगणात कोणतेही काम केलेले नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांसाठी त्यांनी ठोस असे काहीही केलेले नाही.

आताही कांद्याला तेलंगणात जास्त भाव असल्याचे सांगितले जात होते पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणात कांदा विक्रीस नेला असता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. केसीआर सरकार फक्त मोठ-मोठ्या जाहीराती देऊन काम केल्याचा डांगोरा पिटत आहे. जो काम करतो त्याला जाहीरातबाजी करण्याची आवश्यकता भासत नाही.

पंढरपूरमध्ये आषाढीवारी होत आहे. या वारीत हैदराबादहून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ६०० गाड्यांचा ताफा घेऊन येत असल्याची माहिती समजते. पंढरपुरात आषाढी वारीला १० लाख वारकरी जमतात, त्यात केसीआर यांनी बाहेरुन आणखी लोक आणून गर्दी करायची हे बरोबर आहे का? पंढरपूरचा विठोबा हा श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे, त्याचा कोणी राजकीय फायदा उठवत असेल तर योग्य नाही.

आणीबाणीवर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही..

दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू केली होती याचा भाजपाने निट अभ्यास करायला पाहिजे. भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? १९७५ मध्ये अमेरिका-व्हिएतनाम युद्ध सूरू होते आणि त्याच वेळी देशामधील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले होते, काही लोक जाणीवपूर्वक चिथावणी देत होते. इंदिराजींनी आणीबाणी लावली नसती तर देशात लोकशाही राहिली नसती. इंदिराजी गांधी यांनी १८ महिन्यानंतर आणीबाणी उठवली व निवडणुकाही घेतल्या. इंदिराजी गांधी लोकशाहीच्या पाईक होत्या म्हणून लोकशाही वाचली. काँग्रेस पक्षाने आणीबाणीबद्दल नंतर माफीही मागितली आहे.

पण आता देशात काय चालले आहे? आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती आहे. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून कारभार सुरु आहे. ९ वर्षापासून देशात अघोषीत आणीबाणी सुरू आहे त्यावर भाजपाने आधी बोलले पाहिजे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणा-यावर कारवाई केली जाते, सरकारी तपास यंत्रणाचा वारेमाप गैरवापर सुरु आहे, विरोधकांची दडपशाही सुरु असून सरकारविरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. आणीबाणीच्या नावाखाली भाजपा तरूणांना भडकवत आहे ते त्यांनी थांबवावे. भाजपाला आणीबाणीवर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

पहिल्याच पावसात मुंबईत पाण्यात मग कोट्यवधी रुपये गेले कुठे?

राज्यातील शिंदे-फडणीस सरकार हे घोषणाबाज व जाहीरातबाज सरकार आहे. काम काहीच करत नाही फक्त गाजावाजा करत असतात. पहिल्याच पावसाने या सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली. मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले, ६ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला. मुंबईत जागोजागी खड्डे खणून ठेवले आहेत. नालेसफाईसह मुंबईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले पण मुंबई पाण्यात गेलीच, मग खर्च केलेला पैसा गेला कुठे? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

  • Prakash Ambedkar | “… म्हणून मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली; प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण
  • Keshav Upadhye | शरद पवारांना ‘भावी’ प्रधानमंत्री होण्याची घाई झाली – केशव उपाध्ये
  • Bhuvneshwar Kumar | BCCI चा मोठा निर्णय! भुवनेश्वर कुमारची कसोटीनंतर ODI कारकीर्द संपली?
  • Chandrashekhar Bawankule | जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ मोहिमेला साथ देणार नाही; बावनकुळेंचा शरद पवारांना इशारा
  • Chitra Wagh | उद्धव ठाकरे, चोराच्या उलट्या बोंबा मारू नका – चित्रा वाघ
SendShare32Tweet15Share
Previous Post

Prakash Ambedkar | “… म्हणून मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली; प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण

Next Post

ODI World Cup | आज होणार वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! IND vs PAK सामन्याकडं  सर्वांचं लक्षं

जॉईन WhatsApp ग्रुप

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS mhd news whatsapp no

Google News वर Follow करा

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS

महत्वाच्या बातम्या

Chitra Wagh has criticized Uddhav Thackeray and Aditya Thackeray through poetry
Editor Choice

Chitra Wagh | काही वाघांनी मिशांवर मारला ताव पण, बोलायला उघडलं तोंड तेव्हा बाहेर पडलं म्याँव; चित्रा वाघांनी ठाकरेंना डिवचलं

Devendra Fadnavis should become the Chief Minister of Maharashtra said Nitesh Rane
Editor Choice

Nitesh Rane | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं बनले पाहिजे – नितेश राणे

Raj Thackeray has reacted on Mahatma Gandhi's birth anniversary
Editor Choice

Raj Thackeray | जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? – राज ठाकरे

Uday Samant responded to Aditya Thackeray's criticism on foreign tour
Editor Choice

Uday Samant | माझ्या दौऱ्याचा खर्च जनतेसमोर जाहीर करेल; उदय सामंतांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

NEWSLINK

Vijay Wadettiwar | वाघनखे आणणे हे मतांच्या राजकारणासाठी भाजपचा नवीन फंडा – विजय वडेट्टीवार

BJP | लोकसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू; 7 आमदार उतरणार मैदानात?

Bacchu Kadu | अपंगांची कामं होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही – बच्चू कडू

Eknath Shinde | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या रात्रीच्या बैठकीत नेमकं घडलं काय?

Supriya Sule | चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली; सुप्रिया सुळेंनी बावनकुळेंचे कान टोचले

Ajit Pawar | राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह कोणाचं? अजित पवारांनी बोलवली समर्थक आमदारांची बैठक

Jayant Patil | महाराष्ट्रात जे नेते नकोय, त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपाची प्रथा – जयंत पाटील

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • जीवनमान
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In