🕒 1 min read
Manoj Jarange । “जर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबीयांच्या जिवाला धक्का लागला, तर धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” अशी जहरी टीका मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणी येथे जनआक्रोश मोर्चात केली होती. या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
जोपर्यंत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. यानंतर तुकाराम आघाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “बीड जिल्ह्यात मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध कधीच काही झालं नाही. पहिल्यांदाच त्यांच्या मनाविरुद्ध देशमुख हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना त्यांचा खून पचवायचा होता. आम्ही मस्साजोगला बसून गुन्हा दाखल करून घेतला, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
Manoj Jarange claim Dhananjay Munde
“आंदोलन करणारे हे मुंडेंचे लाभार्थी आहेत. मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध संतोष देशमुख हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला. म्हणून यांची माझ्यावर नाराजी आहे आणि त्याचा राग म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असा टोलाही जरांगे यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- बीड प्रकरणी सरकार मुंडे-कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतंय, Jitendra Awhad यांचा गंभीर आरोप
- “Suresh Dhas यांचे गँगस्टरशी कनेक्शन”; नितीन बिक्कडांनी गंभीर आरोप करत सगळा घटनाक्रमच सांगितला
- “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”; ‘त्या’ वक्तव्यावर Sanjay Raut यांनी संजय गायकवाडांना चांगलंच सुनावलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










