🕒 1 min read
कडक उन्हाळ्याने हैराण झालेल्या राज्यात अचानक निसर्गाने असा काही रुद्रावतार धारण केला की लोकांची अक्षरशः पळापळ झाली. ‘इकडे लपू की तिकडे लपू’ अशी अवस्था नागरिकांची झाली होती.
आज अचानक आलेल्या पावसाने (Maharashtra Unseasonal Rain) ने मराठवाडा आणि विदर्भात मोठी दाणादाण उडवून दिली आहे. कुठे धूळीचे लोट, तर कुठे थेट घरांचे पत्रे उडाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Maharashtra Unseasonal Rain
छत्रपती संभाजीनगर शहर आणि वाळूज परिसरात सायंकाळी अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले आणि दिवसाढवळ्या अंधार पडला. वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले.
वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील पत्रे थेट हवेत भिरकावले गेले. रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. दुचाकीस्वारांना तर गाड्या चालवणेही कठीण झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
फक्त संभाजीनगरच नाही, तर राज्याच्या इतर भागांनाही या पावसाने झोडपून काढले. धाराशिवच्या उमरगा, बीडमधील आष्टी, अकोल्यातील अकोट आणि अमरावती शहरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
सलग १० ते ३० मिनिटे पडलेल्या या पावसामुळे तापलेल्या वातावरणात मोठा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एकीकडे वादळाने तारांबळ उडाली असली तरी, दुसरीकडे बळीराजा मात्र काहीसा सुखावला आहे. सध्या राज्यात मान्सूनपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. नांगरणी आणि पेरणीपूर्व तयारीसाठी हा पाऊस संजीवनी ठरणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुषमा अंधारेंना सुशांत शेलारांचा धोबीपछाड; ‘मान अशी-तशी केल्याने…’ म्हणत थेट डिवचलं!
- चांदी 5 लाख, तर सोने 3 लाखांच्या पुढे जाणार; रॉबर्ट कियोसाकींची सोन्या-चांदीबाबत धक्कादायक भविष्यवाणी
- कपिल शर्माच्या घरावर गोळीबार? व्हायरल व्हिडीओनंतर खळबळ, पोलिसांच्या खुलाशामुळे मोठा ट्विस्ट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












