🕒 1 min read
LPG Gas : अचानक घरातील गॅस संपला आणि बाहेरून मिळण्याची कोणतीही सोय नसली तर काय होईल? या कल्पनेनेच सध्या सामान्यांच्या मनात मोठी धाकधूक वाढली आहे.
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाचे पडसाद आता थेट महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी घरगुती गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
वाढत्या टंचाईमुळे प्रशासनाचे LPG Gas Saving Appeal
या भयानक परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी थेट जनतेलाच साद घातली आहे. पाणीटंचाईच्या काळात आपण जसं थेंब थेंब पाणी जपतो, अगदी तसाच गॅसही आता काटकसरीने वापरा, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
सध्या परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत प्रत्येकानेच गॅसचा काटेकोर वापर करणं गरजेचं आहे. असं असलं तरी, नागरिकांनी अजिबात पॅनिक होऊ नये, असं प्रशासनानं वारंवार स्पष्ट केलं आहे. काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात तब्बल ११ विशेष पथकं गॅस एजन्सींची कसून तपासणी करत आहेत.
दुसरीकडे, या गॅस टंचाईचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसला आहे. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये शूटिंगदरम्यान चपातीऐवजी चक्क पाव देण्याची वेळ आली आहे. तर धुळ्यात मंगल कार्यालय चालकांनी प्रशासनाकडे धाव घेतली असून, गॅस न मिळाल्यास नियोजित विवाह सोहळे पुढे ढकलण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यातील मंदिरं आणि गुरुद्वारांमधील अन्नछत्रांवरही या टंचाईचे गडद सावट पडले आहे. गॅस अभावी सध्या हजारो गरजूंना केवळ वरण-भात दिला जात असून चपात्या बनवणं तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. त्यामुळेच लवकरात लवकर ही टंचाई संपावी, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सलमान अली आगाचा मैदानात जोरदार राडा, बांगलादेशी खेळाडूंशी भिडला; नेमकं घडलं तरी काय?
- ‘लहान मुलं गुदमरतायत…’, BMC वर संतापली दीपिका पादुकोण; म्हणाली मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं…..
- काव्या मारनने पाकिस्तानी खेळाडूवर उधळले कोट्यवधी; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











