🕒 1 min read
Team India | क्रिकेटच्या मैदानात कधी कोणता विक्रम मोडेल, हे अजिबात सांगता येत नाही. पण आज टीम इंडियाने जे करून दाखवलंय, त्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
आजच्या IND vs WI Live सामन्यात भारताने केवळ वेस्ट इंडिजचा पराभव केला नाही, तर टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. हा विजय साधासुधा नाहीये, तर तो भारताचा विश्वचषकातील आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी ‘रनचेस’ ठरला आहे.
त्यामुळेच आता सर्वत्र भारतीय फलंदाजांचं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण टी-२० विश्वचषकाच्या इतिहासाचा विचार केला, तर हा तिसरा सर्वात मोठा यशस्वी रनचेस ठरला आहे. या विक्रमी यादीत आता टीम इंडियाने अगदी दिमाखात एन्ट्री मारली आहे.
याआधीचे विक्रम कुणाच्या नावावर आहेत?
तर २०१६ च्या विश्वचषकात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तब्बल २३० धावांचे महाकाय लक्ष्य यशस्वीपणे गाठले होते. दुसरीकडे, २००७ च्या पहिल्याच विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला धूळ चारताना २०६ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता याच दिग्गजांच्या यादीत भारताने आपलं नाव कोरलं आहे.
आजच्या सामन्यात १९६ धावांचे कठीण आव्हान टीम इंडियाने अतिशय सहज पार केले. या ऐतिहासिक विजयामुळे भारताने आपली खरी ताकद पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. आता चर्चा अशी आहे की, या फॉर्ममुळे भारतीय संघ इतर सर्व संघांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Sanju Samson भावूक, सामन्यानंतर केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाला “मी स्वतःवरच…”
- Sanju Samson चा धमाका अन् भारताची उपांत्य फेरीत धडक! सामन्यानंतर धोनी आणि कोहलीबाबत केला मोठा गौप्यस्फोट
- IND vs WI – संजू सॅमसनचा झंझावात, टीम इंडियाचा विश्वचषकात ऐतिहासिक विजय; पण ‘त्या’ ३ धावांमुळे काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now









