🕒 1 min read
ज्या महामुकाबल्याची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत असतं, त्या भारत-पाकिस्तान सामन्यावर (IND vs PAK) आता अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. क्रिकेटच्या मैदानात राजकारण नको असं कितीही म्हटलं तरी, पुन्हा एकदा राजकारणामुळेच चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तान सरकारने घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शहबाज शरीफ सरकारने टी-20 वर्ल्ड कप 2026 बाबत एक अजब भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेत सहभागी होईल, इतर सर्व सामने खेळेल, पण १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकेल, अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तान सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली असून, कोलंबोमध्ये होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यात आपला संघ उतरवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. बांगलादेशबाबत आयसीसीने घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
IND vs PAK Boycott
या सर्व घडामोडींवर आता बीसीसीआयने (BCCI) अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Saikia) यांनी स्पष्ट केलं की, “पाकिस्तानने सामना बहिष्कृत केल्याबाबत बीसीसीआयला अजून कोणतीही अधिकृत सूचना (Official Communication) मिळालेली नाही. आम्ही त्यांच्या अधिकृत निवेदनाची वाट पाहत आहोत.” त्यामुळे जोपर्यंत अधिकृत पत्र येत नाही, तोपर्यंत बीसीसीआय कोणतीही भूमिका घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या या हट्टापायी त्यांनाच कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्ल्डकपमधील भारत-पाक सामना हा आयसीसीसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी मानला जातो. जर हा सामना रद्द झाला, तर त्याचे मोठे आर्थिक परिणाम पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भोगावे लागू शकतात. आता आयसीसी यावर काय तोडगा काढणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लाडकी बहीण योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव द्या; अमोल मिटकरींची मोठी मागणी
- बावनकुळेंची मोठी घोषणा; राज्यातील फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफीचा लाभ
- बजेटमध्ये दारू महागली! आता १००० रुपयांची बाटली मिळणार ‘इतक्या’ रुपयांना!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











