Share

Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे राज्यातील लोकांची फसवणूक करताय; शरद पवार गटाची टीका

🕒 1 min readSharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) टोलनाक्याच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीदरम्यान या मुद्द्यावर तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) टोलनाक्याच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीदरम्यान या मुद्द्यावर तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी काही मोठे निर्णय घेतले आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाइड क्राफ्ट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे महाराष्ट्राच्या लोकांची फसवणूक करत असल्याचं क्लाईड क्रास्टो यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray and Devendra Fadnavis talk and act as scripted – Clyde Crasto

ट्विट करत क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) म्हणाले, “श्री राज ठाकरे यांचे नुकतेच झालेल ‘टोल मुक्त आंदोलन’ म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी “तू मारल्या सारखं कर, मी रडल्या सारखं करतो” करार.

स्क्रिप्ट लिहिल्या प्रमाणे बोलणे आणि वागणे. महाराष्ट्रच्या लोकांची फसवणूक दोघेही करीत आहेत.” क्लाईड क्रास्टो यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्या  भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, टोल नाक्याच्या मुद्द्यावरून आज मंत्री दादा भुसे आणि राज ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोघांत सकारात्मक चर्चा झाली आहे.

येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकारसह मनसेचे कॅमेरे लागतील, ही व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होणार. त्याचबरोबर भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल यांचे आयआयटीकडून सर्वे केले जातील.

प्रत्येक टोलनाक्यावर शौचालय आणि प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध केली जाणार. तर येलो लाईनच्या पुढे गाड्यांची रांग लागल्यावर टोल घेतला जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!