Share

Bajrang Sonavane। “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं, म्हणजे त्यांना अंधारात कोण काय…”; बजरंग सोनावणेंचा खोचक टोला

“अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घेतलं पाहिजे कारण बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास सीआयडीकडे सोपवून काहीही होणार नाही”, असं खासदार बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे.

Published On: 

Bajrang Sonavane। “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं, म्हणजे त्यांना अंधारात कोण काय…”; बजरंग सोनावणेंचा खोचक टोला

🕒 1 min read

Bajrang Sonavane । काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं आहे. त्यानंतर आता या घटनेच्या तपासासाठीच्या घडामोडींना वेग आला असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहेत. अशातच आता खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

“अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घेतलं पाहिजे कारण बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास सीआयडीकडे सोपवून काहीही होणार नाही”, असं खासदार बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे. मागच्या अडची वर्षांच्या काळात बीडचं पालकमंत्रिपद हे धनंजय मुंडेंकडे होतं त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोपही बजरंग सोनावणेंनी केला आहे.

बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुवव्यस्था पूर्वपदावर यावी. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी सोनवणे यांनी केली. “संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात अद्याप तीन आरोपी फरारी आहेत. त्यांना पकडण्यात  पोलिस दिरंगाई का करतात?”, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही