🕒 1 min read
राजकारणात योजनांची नावं बदलणं आणि त्यावरून वाद होणं हे काही नवीन नाही, पण आता राज्याच्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या योजनेचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ला (Ladki Bahin Yojana) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी समोर आली आहे. या मागणीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ही मागणी लावून धरली आहे. ते म्हणाले की, “ही योजना अजितदादांच्या दूरदृष्टीतून साकार झाली होती. त्यामुळे त्यांच्या आठवणी जपण्यासाठी या योजनेचे नामकरण ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ असं करण्यात यावं.”
Ladki Bahin Yojana Name Change
मिटकरींच्या या मागणीवर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं. फडणवीस म्हणाले, “लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या समोर येत आहेत. याबाबत आम्ही सर्वजण एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ.” फडणवीसांनी ही मागणी फेटाळली नाही, पण थेट होकारही दिला नाही, त्यामुळे सस्पेन्स कायम आहे.
दुसरीकडे, आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याची महसुली तूट वाढत असल्याचं समोर आलं आहे. मात्र, तिजोरीवर भार पडत असला तरीही ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असं महायुती सरकारने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. जून २०२४ पासून सुरू झालेली ही योजना कधी निधीमुळे तर कधी केवायसीमुळे चर्चेत राहिली. आता ‘नामांतराच्या’ विषयामुळे ही योजना पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात केंद्रस्थानी आली आहे. सरकार आता यावर काय निर्णय घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- संसदेच्या पायऱ्यांवर पुन्हा जुळली ‘केमिस्ट्री’; संसदेत एकत्र दिसले कंगना रनौत-चिराग पासवान
- लाडक्या बहिणींची दिवाळी! आता थेट ४५०० रुपये खात्यात जमा होणार; सरकारचा मोठा निर्णय
- वर्ल्डकपमध्ये भारताला ‘या’ गोष्टीपासून मोठा धोका; धोनीने स्पष्टच सांगितलं, म्हणाला “मी सुद्धा…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











