🕒 1 min read
बीड | प्रतिनिधी: जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे समाजमन संतप्त झालं असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी कारवाई बीडमध्ये राबवण्याची मागणी केली आहे. परळीसारख्या भागात दहशतवादी शैलीत गुंडराज फोफावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अलीकडेच बीडमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला असून, या घटनेने जिल्ह्यातील भयावह परिस्थिती पुन्हा अधोरेखित केली आहे. स्थानिक गुंडांना राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याचा आरोप करण्यात येतो. त्यामुळे पोलीस यंत्रणाही कारवाईस असहाय्य ठरत असल्याचे चित्र आहे.
Anjali Damania Demands Operation Sindoor in Beed
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणातही सुरुवातीला तपास दाबण्याचा प्रयत्न झाला, मात्र नंतर काही बड्या चेहऱ्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. तरीही गुन्हेगारीला लगाम बसलेला नाही, असे अनेक प्रकरणांतून दिसून येते.
“सीमेवर ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडलं, तसंच आता बीडमध्येही गुन्हेगारांवर कारवाई करावी,” अशी मागणी दमानियांनी केली आहे. “परळी हा दहशतीचा अड्डा बनला असून, लहान मुलंही मारहाणीत सहभागी होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या या मागणीला सामाजिक स्तरावर अनेकांनी त्यांच्या पाठिंबा दर्शवला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
- कोरोना पुन्हा डोके वर काढतोय! कोव्हिड-19 ची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय, प्रशासन सतर्क
- राज ठाकरेंच्या वागणुकीने दुखावलो होतो – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








