दिल्ली : NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार (Centre Government), शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी इशारा दिला की, धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा, यापेक्षाही मोठ्या आंदोलनाची हाक दिली जाईल.
अभिजीत दिपके म्हणाले, “जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर, काल मुंबईत सर्वात मोठे निदर्शन झाले. तिथल्या पोलीस आयुक्तांनी टिप्पणी केली की, हे पुण्यातील इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन होते. बिहारमध्ये आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. मी बिहार सरकारला सांगतो, ही चूक करू नका. तुम्ही ज्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुरुंगात डांबाल, त्यापेक्षा अधिक विद्यार्थी रस्त्यावर उतरतील. १४ देशांमधील भारतीयांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी केली आहे. मोदी-साहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांचा राजीनामा लवकर स्वीकारा, नाहीतर तुमचीही वेळ येईल.”
दिल्ली पोलिसांनी वर्दी काढून टाकावेत आणि…
“दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे. काहीतरी चांगले काम करा. पोलीस असे वागत आहेत की जणू काही ते भाजपचे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत. जर त्यांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेणे थांबवले नाही, तर आम्ही पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढू. लक्षात ठेवा, जर आम्ही पोलीस मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले, तर आम्ही तिथून हलणार नाही. दिल्ली पोलिसांची जागतिक स्तरावर थट्टा होत आहे. जगाच्या पाठीवर अशी चाटुगिरी मी कुठेही पाहिलेली नाही. जर तुम्हाला भाजपची सेवा करायची असेल, तर तुमचे गणवेश काढून टाका. आता दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांना पाहून राग येतो. गणवेशाचा अपमान करू नका. दिल्ली पोलिसांनी त्यांचे गणवेश काढून त्याऐवजी आरएसएसची ‘हाफ-चड्डी घाला,” अशी टीका त्यांनी केली.
“अन्यथा मोठे आंदोलन आम्ही पुकारू”
अभिजीत दिपके पुढे म्हणाले की, “केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अन्यथा, २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन आम्ही पुकारू. तुम्हाला नरेंद्र मोदींचाही राजीनामा हवा आहे का? तोही आम्ही मिळवू. अमित शाह यांचा हवा आहे का? एकासाठी चहाचे दुकान आणि दुसऱ्यासाठी समोशाची गाडी आम्ही सुरू करू शकतो. तिथे राघव चढ्ढा यांना चहा आणि समोसे विकायला उभे करू. राघव चढ्ढा हे ‘जेन-झी’ (Gen-Z) पिढीचे एक मोठे नेते बनण्याच्या मार्गावर होते. ”जेन-झी’ पिढी आपल्या पालकांनाही घाबरत नाही, मग ते मोदींना का घाबरतील? लोकांना इतके घाबरवू नका की ती भीतीच नाहीशी होईल. गेल्या बारा वर्षांत इतकी दहशत निर्माण केली गेली आहे की आता भीतीच उरलेली नाही.जेन-झी घरात, शाळेत, महाविद्यालयात आता पंतप्रधानांनाही सवाल करतात. ‘जेन-झी’च्या या वृत्तीला मी सलाम करतो.”
“त्यांना आम्ही न्यायालयात खेचू”
“गेल्या बारा वर्षांपासून एका व्यक्तीला खऱ्या मुद्द्यांपेक्षा वरचे स्थान दिले गेले आहे. त्या व्यक्तीला पुन्हा मुद्द्यापेक्षा मोठे करू नका. अशिक्षित पंतप्रधान असण्याचे परिणाम आपण पाहत आहोत. जेव्हा ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली, तेव्हा फेरपरीक्षेसाठी हवाई दलाची मदत घ्यावी लागली. सुशिक्षित पंतप्रधान असणे अत्यंत आवश्यक आहे. मोदी हे अत्यंत असुरक्षिततेची भावना असलेले व्यक्ती आहेत,” असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
“दिल्ली पोलिसांना लाच घेण्याची सवय”
दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेले सौरभ दास यांनीही दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली. “दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांचे अन्न लुटायला सुरुवात केली आहे. त्यांना लाच घेण्याची सवय जडली आहे. जंतर-मंतरवरील अन्नपुरवठा बंद करून आम्हाला उपाशी ठेवण्याचा तुमचा इरादा आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- NEET पेपरफुटीवर निर्मला सीतारमण यांचे वक्तव्य वादात; विरोधकांचा हल्लाबोल
- NEET वादात राघव चढ्ढा अचानक अॅक्शन मोडवर; मोदींच्या पोस्ट केल्या रीपोस्ट
- राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ; मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्हे अलर्टवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












