Maharashtra Rain Forecast: ऑगस्ट महिना कोरडा गेला, आता हातातोंडाशी आलेलं पीक वाचणार का? शेतकऱ्यांच्या मनातील याच प्रश्नाला आता थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, देशात मान्सून पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करण्याच्या तयारीत आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकताच एक मोठा अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे येत्या २४ तासांत देशातील तब्बल १९ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांत प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय? शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठी दडी मारली होती. पावसाअभावी खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला होता, पण आता सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
Maharashtra Rain Forecast: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय
कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. यावेळी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे.
दुसरीकडे, देशातील यूपी, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेशसह १९ राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. डोंगर भागात भूस्खलनासारख्या घटनांचा धोका असल्याने नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘त्यानं साधा प्रयत्नही केला नाही…’; सूर्याने अखेर उलगडलं कुलदीप यादवसोबतच्या त्या वादानंतरचं सत्य!
- ‘उद्या तुम्ही मला मारताल…’; शिंदेंच्या समोरच बंडू जाधवांनी मनोज जरांगेंची जाहीर माफी मागितली
- शिंदेंच्या उपस्थितीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर परभणीत नेमकं काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











