Share

एल निनोचा फटका! राज्यात पावसाची आणखी दडी, सरकारकडून पाणीकपातीचे मोठे संकेत

राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता नसल्याने पाणीसंकट गडद झाले आहे. मुंबईत २० टक्के पाणीकपातीचा विचार सुरू असून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन सरकारने केले आहे.

Published On: 

Maharashtra Monsoon Update - राज्यात लांबलेल्या पावसामुळे कोरडी पडलेली जमीन आणि धरणे

🕒 1 min read

Maharashtra Monsoon– अर्धा जून महिना संपला तरी मान्सूनचा पत्ता नाही, यामुळे तुमचीही चिंता वाढलीये का? एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने चांगलीच दडी मारली असून, राज्यावर मोठ्या पाणीबाणीचे ढग दाटून आले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याच गंभीर परिस्थितीवर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाही. म्हणजेच २० जूननंतरच मान्सूनची दमदार हजेरी पाहायला मिळू शकते.

Maharashtra Monsoon El Nino Impact

पाऊस लांबल्याने धरणांमधील पाणीसाठा वेगाने तळ गाठत आहे. सध्या राज्यात केवळ २४.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात हाच आकडा ३१.१० टक्के होता. ही आकडेवारीच भविष्यातील संकटाचे गांभीर्य स्पष्ट करते.

पाणीटंचाईची ही झळ आता मुंबईसारख्या मोठ्या शहरांनाही बसण्याची चिन्हे आहेत. अधिकृत सूत्रांनुसार, आगामी काळात मुंबईत २० टक्क्यांपर्यंत पाणीकपात लागू करण्यावर गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे बनले आहे.

दुसरीकडे, पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची चिंता आणखी वाढली आहे. मात्र, दुबार पेरणीचा मोठा आर्थिक फटका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. पावसाचा योग्य अंदाज आल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असा स्पष्ट सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही