🕒 1 min read
मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले की, छगन भुजबळ यांना मंत्रीपद देताना अजित पवार यांना विचारण्यात आले नाही. हे निर्णय दिल्लीतून थेट घेण्यात आले आणि त्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले असतील, त्यांना झोप लागत नसेल, असे राऊत म्हणाले.
राऊत यांनी असेही नमूद केले की, आजचे राजकारण स्वार्थी आणि मतलबी झाले आहे. लोक केवळ आपल्या फायद्यासाठी पक्ष बदलतात आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडतात. सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही, असा थेट टोला राऊतांनी सुळे यांना लगावला.
Sanjay Raut Slams Ajit Pawar Over Chhagan Bhujbal
सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना राऊत म्हणाले, “तहान लागतेच, पण कोणत्या डबक्यात उडी मारायची हे पाहावं लागतं. महासागरात उडी घेतली तरी तिथे लाटा आहेत, गर्दी आहे, आणि अस्तित्वासाठी धडपड चालू आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- हगवणे कुटुंबाला शासनाचा मोठा दणका! वैष्णवी आत्महत्या प्रकरणानंतर मामाचा अतिरिक्त पदभार काढला
- “निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी!” – वैष्णवीच्या चारित्र्यहननावर गिरीश महाजन वकिलावर भडकले
- “माझी मुलगी गेलीय… तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नको!” हात जोडून विनवणी, वडिलांना अश्रू अनावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












