Share

दहशतवादी हल्ल्याला युद्ध उत्तर नाही; ऑपरेशन सिंदूरवरुन राज ठाकरे यांची मोदी सरकारवर टीका

“War is not the answer to terrorism,” says Raj Thackeray, slamming the Modi government over Operation Sindoor and urging for deeper action beyond airstrikes.

Published On: 

Operation Sindoor Not the Answer to Terrorism, Says MNS Raj Thackeray Targeting Modi Government

🕒 1 min read

मुंबई | पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राइकवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दहशतवादी हल्ल्याला युद्ध उत्तर नाही. ( War is not the answer to terrorism says Raj Thackeray ) अतिरेक्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जी पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील”, असं ते म्हणाले. त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत सांगितलं की, “तो देश आधीच बरबाद झालेला आहे.”

राज ठाकरे यांनी हल्ल्यानंतर सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “मॉकड्रील करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा. दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे फिरतात, तिथे सुरक्षा का नव्हती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Operation Sindoor Not the Answer to Terrorism, Says Raj Thackeray

“सरकारने गंभीरतेने भूमिका घेण्याची गरज होती. अशा वेळी पंतप्रधान सौदी अरेबिया दौऱ्यावर, बिहार प्रचारात, केरळ उद्घाटनात, मुंबईत वेव्ह समिटमध्ये दिसले. हे कार्यक्रम टाळले जाऊ शकले असते,” असंही त्यांनी नमूद केलं.

ते पुढे म्हणाले, “आज नाक्यांवर ड्रग्स मिळत आहेत, त्याच्या मुळाशी जाऊन कारवाई करणे जास्त महत्त्वाचं आहे.” राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!