🕒 1 min read
मुंबई – बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकातली लोकप्रिय जोडी म्हणजे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित. या दोघांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र एक असा क्षण आला की माधुरीने ठरवलं की ती पुन्हा अनिल कपूरसोबत काम करणार नाही.
हा निर्णय घ्यायला माधुरीला भाग पाडणाऱ्या घटनेचा उलगडा आता जुन्या रिपोर्ट्समधून झाला आहे. अभिनेत्रीच्या माजी मॅनेजर रिक्कू राकेश नाथ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘तेजाब’ चित्रपटाच्या वेळी अनिलने माधुरीबद्दल एक टीका केली होती, पण नंतर दोघांचं बॉन्डिंग वाढलं. काही काळात त्यांच्या अफेअरच्या चर्चाही सुरू झाल्या.
Madhuri Dixit decided never to work with Anil Kapoor
या चर्चांना पुष्टी मिळाली, जेव्हा अनिल कपूरची पत्नी सुनीता, मुलांसह थेट सेटवर पोहोचली. हे पाहून माधुरीला जाणवलं की हे प्रकरण वैयक्तिक आयुष्यात अडथळा ठरू शकतं. त्यामुळे तिने ठाम निर्णय घेतला की भविष्यात अनिलसोबत काम करायचं नाही.
माधुरीने स्पष्टपणे एका मुलाखतीत सांगितलं होतं, “मी कधीच असं काही करणार नाही ज्याचा कुणाच्या कुटुंबावर परिणाम होईल.” दोघांनी यानंतर तब्बल 17-18 वर्षांनी ‘टोटल धमाल’ चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
📌 महत्वाच्या बातम्या
- शरद पवार राष्ट्रपती झाले असते, जर महायुतीत आले असते; केंद्रीय मंत्र्याचे मोठे विधान
- पाकव्याप्त काश्मीर भारताला मिळालाच पाहिजे; गरज भासल्यास पाकिस्तान ताब्यात घ्या – रामदास आठवले
- शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय; शिंदेंच्या शिवसेनेत घमासान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







