🕒 1 min read
दिल्ली – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. “पाकिस्तान हा दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात यायलाच हवा. गरज भासली, तर पाकिस्तानलाच ताब्यात घेण्याची वेळ येऊ शकते,” असं ठाम विधान त्यांनी केलं.
“डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आदर आहे, पण कोणाच्याही मध्यस्थीची भारताला गरज नाही. आम्ही थेट पाकिस्तानसोबत बोलायला तयार आहोत, पण त्याआधी पाकने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा,” अशी भूमिका आठवलेंनी मांडली. त्यांनी असंही नमूद केलं की, “युद्धविरामाची विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली आहे, म्हणजे त्यांनी हार मान्य केली आहे.”
Ramdas Athawale Demands PoK Return
दरम्यान, आंतरजातीय विवाह मदत योजना बंद होणार नाही, असं स्पष्ट करत आठवलेंनी सांगितलं की, “दरवर्षी अडीच लाख आंतरजातीय विवाह होतात. त्यामुळे समाज एकत्र येतोय.”
संजय शिरसाट यांनी समाजकल्याण विभागाच्या निधीविषयी केलेल्या वक्तव्यावर देखील आठवलेंनी प्रतिक्रिया दिली. “गोरगरिबांच्या हितासाठी असलेला निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवणं चुकीचं आहे. अन्य खात्यांचा निधी वळवावा, समाजकल्याण खात्याचा नव्हे. कर्नाटकात असे कायदे आहेत की अशा निधीचा वापर अन्यत्र करता येत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय; शिंदेंच्या शिवसेनेत घमासान
- राज-उद्धव युतीत संजय राऊत अडथळा; प्रकाश महाजन यांचा गौप्यस्फोट
- राज ठाकरेंच्या युद्धविरोधी भूमिकेवर कार्यकर्ते बुचकळ्यात; मनसे समर्थकांना मानसिक दुःख













