🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना फुटण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट का पडले? याबाबत राऊतांनी धक्कादायक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नाही तर दिल्लीतील भाजप नेत्यांनी शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Shivsena has split because of Amit Shah
माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे शिवसेना फुटली नाही. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यामुळे शिवसेना फुटली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई कमजोर करण्यासाठी त्यांनी हा डाव आखला होता. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून त्यांनी हे सर्व केलं आहे.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “शिवसेना सोडून जाणाऱ्या 12 ते 13 आमदारांवर ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू होती. याच गोष्टीचा फायदा घेऊन अमित शहा यांनी शिवसेना पक्ष फोडला आहे. मुंबई ताब्यात घेण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचलं होतं. त्याचबरोबर मराठी माणसाचं वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी हे केलं आहे.”
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. अशात संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपानंतर राज्यात पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. राऊतांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Gold Rate | सोन्या चांदीच्या किमतीत बदल! जाणून घ्या प्रति तोळा भाव
- Love Jihad | लव्ह जिहाद प्रकरण चर्चेत असताना मुस्लिम मुलीने बांधली हिंदू मुलासोबत लग्नगाठ
- Weather Update | कुठे तीव्र ऊन तर कुठे मुसळधार पाऊस, पाहा हवामान अंदाज
- Religion Conversion | ‘आम्ही आमच्या मर्जीने धर्म बदलला’ हिंदू महिला शिक्षिकांनी केला मुस्लिम धर्मात प्रवेश
- Amruta Fadnavis | देवेंद्र फडणवीस आणि माझा घटस्फोट होऊ शकतो? अमृता फडणवीस असं का म्हणाल्या?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











