Share

Sanjay Raut | प्रत्येक संकटापासून हे सरकार पळतंय – संजय राऊत

Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात काही भारतीय जवानांना वीरमरण आलं आहे. ही घटना घडत असताना भाजपच्या कार्यालयात एक मोठा कार्यक्रम पार पडला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे. हे सरकार प्रत्येक संकटापासून पळत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. The current government is … Read more

Published On: 

Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यात काही भारतीय जवानांना वीरमरण आलं आहे. ही घटना घडत असताना भाजपच्या कार्यालयात एक मोठा कार्यक्रम पार पडला.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे. हे सरकार प्रत्येक संकटापासून पळत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

The current government is cowardly and illegitimate – Sanjay Raut 

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सध्याचं सरकार डरपोक आणि बेकायदेशीर आहे. प्रत्येक संकटापासून हे सरकार पळून जात आहे. तोंडाला पान पुसत आहे.

देशाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काल या देशामध्ये अतिरेक्यांकडून भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची हत्या झाली आहे. चार लष्करी अधिकारी एकाच वेळी शहीद झाले आहे.

या घटनेनंतर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली आहे. चार वरिष्ठ अधिकारी शहीद झाल्यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ झाला आहे. ही घटना घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजप कार्यालयामध्ये स्वतःवर पुष्पृष्टी करून घेत आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी शिवाजीराव पाटील यांनी फक्त शर्ट बदलला होता. फक्त शर्ट बदलला म्हणून त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

कालच्या शहीद जवानांच्या कुटुंबावर शोककळा पसरली, आमच्यावर शोककळा पसरली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर संपूर्ण भारतीय जनता पक्ष दिल्लीतील कार्यालयात उत्साह साजरा करत होता.

हा त्यांचा सनातन धर्म आहे. हा आमचा सनातन धर्म नाही. त्यांचा हा भारत वेगळा आहे. हा भारत आमचा नाही. जे चार जवान शहीद झाले ते भारताचे सुपुत्र होते.

राजकीय कारणासाठी त्यांनी इंडियाचं भारत केलं आहे. मात्र, नाव बदलून प्रश्न सुटत नाही. या घटनेवरून आम्हाला देशाच्या गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारायचे आहे. कारण देशाची अंतर्गत सुरक्षा त्यांची जबाबदारी आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही