🕒 1 min read
बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या आयपीएलमधील पहिल्या जेतेपदाच्या जल्लोषावेळी (RCB celebration) मोठी दुर्घटना घडली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर खेळाडूंना पाहण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच गर्दीत चेंगराचेंगरी झाली असून, यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आणि 47 जण जखमी झाले आहेत.
Anushka Sharma’s first reaction to 11 people died
ही घटना बुधवारी दुपारी स्टेडियमबाहेर घडली. स्टेडियमची क्षमता केवळ 35,000 असूनही, दोन ते तीन लाखांपेक्षा अधिक लोक या भागात जमा झाल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवरही खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
RCB टीमने अधिकृत निवेदनात या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, “सर्वांच्या सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देतो. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत,” असं म्हटलं आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) हीच पोस्ट शेअर करत लिहिलं, “मी नि:शब्द झालोय. अतिशय दु:खी आणि निराश झालोय.” तर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) हृदयविदारक इमोजीसह ही पोस्ट शेअर केली. जल्लोषाच्या वेळी अनुष्का टीम बसमध्ये सहभागी होती आणि तिने चाहत्यांची गर्दी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली होती.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याचंही सांगितलं. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून, भाजपने काँग्रेस सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हा प्रसिद्ध अभिनेता RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार?
- आईपीएल 2025 फायनलमध्ये पंजाबचा पराभव, प्रीति झिंटा रडली; चाहत्यांचे मन हेलावले
- “18 वर्षांपूर्वीचं स्वप्न अखेर पूर्ण! RCB चं विजेतेपद पाहून विजय मल्ल्या भावुक”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











