🕒 1 min read
मान्सून राज्यात दाखल होऊन तब्बल २० दिवस उलटले तरी पावसाचा पत्ता नव्हता, यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण आता अखेर ती बहुप्रतीक्षित आनंदाची बातमी आली आहे!
गेल्या २४ तासांपासून मुंबईसह राज्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. हवामान खात्याने (Panjabrao Dakh Forecast) २२ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल असा जो अंदाज वर्तवला होता, तो आता तंतोतंत खरा ठरतोय. येत्या ३० जूनपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Panjabrao Dakh Monsoon Forecast
दुसरीकडे, राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनीही मान्सूनबाबत एक मोठा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, येत्या १० जुलैपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढलेला पाहायला मिळेल.
पुढील काही तासांत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, बीड, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ अशा तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
डख यांच्या अंदाजानुसार, २४ ते २६ जून या काळात राज्यात पावसाचा तडाखा सर्वाधिक असणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. डख यांनी स्पष्ट केलंय की, कोणत्याही शेतकऱ्याने काळजी करण्याचं कारण नाही, कारण सर्वांच्या पेरण्या आता अगदी वेळेत पूर्ण होणार आहेत.
आज मुंबई, पुणे, घाटमाथा, नाशिक आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालेल. त्यानंतर हाच पाऊस मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता सर्वत्र पाऊस बरसणार असल्याने ग्रामीण भागात पेरण्यांना मोठा वेग येणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विद्या बालनची ‘हास्यजत्रे’तील ओंकार भोजनेच्या स्कीटवर रील! व्हिडिओवर स्टार्सच्या भन्नाट कमेंट्स
- करीना कपूरने थेट जसप्रीत बुमराहला दिलं चॅलेंज! ‘त्या’ व्हायरल फोटोवर क्रिकेटरचं भन्नाट उत्तर
- Kolkata Warehouse Collapse: ५ जणांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












