पुणे– राजकारणात सत्तेसाठी कुणी कोणत्या थराला जाईल, याचा खरंच काहीच नेम उरलेला नाही का? हाच प्रश्न आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. राज्यात फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलं असतानाच, हाकेंनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय.
एकनाथ शिंदेंची साथ असताना सत्तेत अजित पवारांच्या गटाला घेण्याची खरंच गरज होती का? असा थेट सवाल हाकेंनी उपस्थित केला आहे. नुसती पक्ष फोडाफोडी करण्यापेक्षा नेत्यांनी आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची वेळ आली असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
Laxman Hake on Devendra Fadnavis
सध्याचे भाजप नेते हे ओबीसींचे राहिले नसून ते आता थेट कारखानदारांचे झाले आहेत, असा गंभीर आरोप हाकेंनी केलाय. “प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हेच आता भाजपचे खरे डीएनए आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
दुसरीकडे, आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना ‘पक्ष फोडणं बंद करण्याची सद्बुद्धी मिळो’, असं साकडंही त्यांनी थेट पांडुरंगाच्या चरणी घातलं आहे. सत्ता आणि खुर्च्या येत-जात असतात, पण जनतेचे प्रश्न सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे, अशी उद्विग्नता त्यांनी बोलून दाखवली.
📌 महत्वाच्या बातम्या
- भाजपचा DNA आता कारखानदारांचा, देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
- अभिजीत दिपकेंच्या ‘संसद चलो’ मोर्चाला पोलिसांचा ब्रेक? दिल्लीत कलम १६३ लागू, अन्यथा थेट कारवाईचा इशारा
- मोठा राजकीय ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने चर्चांना पूर्णविराम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












