राजकारणात चेष्टामस्करी कधी अंगलट येईल, हे खरंच सांगता येत नाही. आता थेट इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावरून असाच एक मोठा राजकीय वाद पेटलाय. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी मेलोनी यांच्यावरून एक मिश्किल पण वादग्रस्त टिप्पणी केली होती. आता यावरून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक जीवनात एकमेकांचा आदर राखणे अत्यंत गरजेचे असल्याचा कडक संदेश मंत्रालयाने दिलाय.
‘मेलोनी समजून मिठी मारली नाही ना?’; Giorgia Meloni वरून रंगला वाद
एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली. ‘फक्त नेत्यांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नव्हे’, असा टोला त्यांनी लगावला. हेच समजावून सांगण्यासाठी राहुल यांनी बाजूला उभ्या असलेल्या संदीप दीक्षित यांना अचानक मिठी मारली.
त्याचवेळी दीक्षित यांनी मिश्किलपणे विचारलं, “एक गोष्ट विचारू? मेलोनी समजून तर मिठी मारली नाही ना?” यावर राहुल यांनीही हसत, “मी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही”, असं उत्तर दिलं. हाच संवाद आता वादाचं मोठं कारण ठरलाय.
थोडक्यात सांगायचं तर, या वक्तव्याची परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी गंभीर दखल घेतली. भारत आणि इटलीचे संबंध अलिकडच्या काळात खूप मजबूत झाले आहेत. त्यामुळे राजनैतिक पातळीवर सार्वजनिक जीवनात एकमेकांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, या मुद्द्यावरून आता भाजपनेही राहुल गांधी आणि दीक्षित यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटलांना 102 ताप; टायफॉइडची लक्षणं, रुग्णालयातून मोठी अपडेट
- Rahul Gandhi vs BJP: अमित शहांवरील ‘ती’ टीका भोवणार? राहुल गांधींना लोकसभेकडून डेडलाईन
- ‘75 वर्षांवरील नेत्यांनी सत्ता सोडावी अन् युवांच्या हाती सत्ता द्यावी’; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा












