🕒 1 min read
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange ) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारविरोधात उपोषण करणार असल्याचे सांगितले. जर राज्य सरकारने २८ ऑगस्टपर्यंत त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे सहा मुख्य मागण्या केल्या आहेत. त्या मान्य न झाल्यास त्यांनी यावेळी ‘विजयाचा रथ’ किंवा ‘अंत्ययात्रा’ यातून एक आणू, असा ठाम निर्धार व्यक्त केला. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.
Maratha reservation activist Manoj Jarange Patil declares hunger strike in Mumbai starting August 29
याआधीही मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली होती. मात्र अद्यापही ठोस तोडगा न निघाल्याने, मनोज जरांगे पाटील यांचे हे आंदोलन सरकारसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- माझ्याबाबतीत अर्ध सत्य सांगितले जाते पण, मी लहानपणापासून पूजा करतो – शरद पवार
- सूरज चव्हाणचा बिग बॉस इफेक्ट सिनेमावर दिसलाच नाही; ‘झापुक झुपूक’च्या कमाईत घसरण
- रात्रीची शेवटची सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापूरपर्यंतच, प्रवाशांचे होणार हाल