🕒 1 min read
दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेच्या चर्चांना मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी संसदेत सांगितले की, सध्याची शस्त्रसंधी केवळ 18 मे पर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे पुन्हा सीमारेषेवर तणाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
डार यांनी स्पष्ट केलं की, 10 मेपासून सुरू झालेल्या डीजीएमओ स्तरावरील चर्चांनंतर 18 मेपर्यंतची मर्यादित शस्त्रसंधी ठरली आहे. मात्र, ही शस्त्रसंधी कायमस्वरूपी राहण्यासाठी राजकीय पातळीवरील चर्चेची गरज आहे.
Pakistan Ends Ceasefire With India on May 18?
तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान भारताला चर्चेच्या टेबलावर खेचून सिंधू जलवाटप करारावर चर्चा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने मात्र दहशतवादावर ठोस पावलं न घेतल्यास कोणतीही चर्चा शक्य नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
यामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत दबाव वाढला असून, भारतही अत्यंत सावध भूमिका घेत आहे. सीमारेषेवर पुन्हा एकदा हालचालींना वेग येण्याची शक्यता असल्याचे जाणकार सुचवतात.
📌 महत्वाच्या बातम्या
- ठाकरे गटाला आणखी एक धक्का, विदर्भातील बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
- खासदार करतो तर करतोच, काटा काढतो तर काढतोच!; अजित पवारांची तुफान फटकेबाजी
- मिशिगनमधील लष्करी तळावर ISIS चा मोठा हल्ला टळला; FBI ची वेळेवर कारवाई













