Share

पोलिसांनी शब्द फिरवला? लंडनला निघालेल्या डॉ. संग्राम पाटलांना पुन्हा रोखलं; एअरपोर्टवर हायव्होल्टेज ड्रामा!

डॉ. संग्राम पाटील यांना लंडनला परत जाताना मुंबई विमानतळावर इमिग्रेशन विभागाने रोखले. पोलिसांनी LOC रद्द करण्याचे आश्वासन देऊनही शब्द फिरवल्याचा पाटलांचा गंभीर आरोप.

Published On: 

Dr Sangram Patil Detained Mumbai Airport

🕒 1 min read

मुंबई– “मी (Dr Sangram Patil) चौकशीला सहकार्य केलं, सगळी उत्तरं दिली, तरीही माझ्याशी असं का?” हा प्रश्न सध्या मुंबई विमानतळावर चर्चेचा विषय ठरलाय. १० जानेवारीला ज्या अटकेच्या नाट्याने खळबळ उडवून दिली होती, त्याचा दुसरा अंक आज (१९ जानेवारी) पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डॉ. संग्राम पाटील (Dr Sangram Patil) हे निर्धास्तपणे आपल्या लंडनच्या घरी परतण्यासाठी विमानतळावर पोहोचले, पण ‘लुकआऊट सर्क्युलर’ (LOC) च्या फासात ते पुन्हा अडकले आहेत. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना थेट “तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही” असं सांगत रोखल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

Dr Sangram Patil LOC Issue Mumbai Airport

डॉ. पाटील हे आज सकाळी लंडनला जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. १६ जानेवारीला त्यांनी पोलिसांच्या चौकशीला हजर राहून सहकार्य केले होते. पाटील यांच्या दाव्यानुसार, त्यावेळी पोलीस उपायुक्तांनी (DCP) आणि तपास अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की, “तुमची चौकशी पूर्ण झाली आहे, आम्ही LOC रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत.” मात्र, आज जेव्हा ते चेक-इन साठी गेले, तेव्हा सिस्टिममध्ये त्यांच्या नावावर अद्यापही LOC ॲक्टिव्ह असल्याचं दिसून आलं.

विमानतळावर अडकल्यानंतर डॉ. पाटलांनी आपली हतबलता व्यक्त केली. ते म्हणाले, “पोलिसांनी १० तारखेलाच माझ्या सह्या घेतल्या होत्या, माझा पासपोर्ट फोटोही घेतला होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की १९ तारखेला तुम्हाला जाता येईल. मात्र, आज अचानक मला रोखण्यात आलं. माझी पत्नी आणि मी दोघेही विमानतळावर ताटकळत आहोत.” वरिष्ठ पातळीवरून हे सर्क्युलर मागे घेण्याचे आदेशच आले नाहीत का? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

युकेचे नागरिक, पण मुंबईत अडकले!

डॉ. पाटील हे युनायटेड किंगडम (UK Citizen) चे नागरिक आहेत. त्यांची दोन्ही मुलं सध्या लंडनमध्ये असून त्यांचा वैद्यकीय जॉबही तिथेच आहे. “माझं तिकडचं सगळं करिअर आणि कुटुंब वाऱ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कायद्यानुसार मला मुक्त संचाराचा अधिकार आहे, पण एका सोशल मीडिया पोस्टसाठी मला गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

हे संपूर्ण प्रकरण एका फेसबुक पोस्टभोवती फिरतंय. भाजपचे सोशल मीडिया संयोजक निखिल भामरे (Nikhil Bhamre) यांनी डॉ. पाटील आणि ‘शहर विकास आघाडी’ या पेजेस विरोधात तक्रार केली होती. १४ डिसेंबर २०२५ ला पंतप्रधान आणि एका महिलेबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच गुन्ह्यात १० जानेवारीला पहाटे त्यांना विमानतळावरच ताब्यात घेतलं होतं. तेव्हा त्यांना फक्त नोटीस देऊन सोडलं होतं, पण आता ‘देश सोडण्यास मनाई’ केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सध्या पोलीस यावर काय भूमिका घेतात आणि डॉ. पाटलांना लंडनला जाण्याची परवानगी कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

घटनाक्रम- 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या